PWD News
PWD News esakal
जळगाव

Jalgaon News : रस्त्यांच्या कामांसाठी दोन्ही अभियंत्यांची जबाबदारी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील रस्त्यांच्या कामांबाबत वाद होत आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम असले तरी महापालिकेच्या अभियंत्यांनीही त्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहेत. (Collector Orders that Responsibility of both engineers for road works jalgaon news)

जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातून शहरातील ४९ रस्त्यांची कामे सुरू आहेत. महापालिकेअंतर्गत रस्ते असले तरी रस्त्यांची कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या कामांचा मक्ता जळगाव येथील श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांना दिला आहे. त्यांच्यामार्फत रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, या रस्त्याची कामे संथगतीने होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. ही कामे गतीने व्हावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

महापालिकेतर्फे कामात व्यत्ययाची तक्रार

रस्त्याच्या कामांत महापालिकेतर्फे व्यत्यय आणला जात असल्याची तक्रार मक्तेदारांची आहे. रस्ते तयार केल्यानंतर महापालिका त्या ठिकाणी जलवाहिनीसाठी खोदकाम करीत असते. त्यामुळे या रस्त्याचे काम पुन्हा करावे लागते.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

परिणामी, रस्त्याच्या कामात विलंब होत असल्याचा आरोप मक्तेदारांचा आहे. रस्त्याचे काम होण्यापूर्वीच महापालिकेने जलवाहिनी टाकून घ्यावी, अशी मागणीही मक्तेदाराने केली आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही पत्र दिले असल्याचे सांगण्यात आले.

दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा

जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांचा वाद जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्याचे सांगण्यात आले. आमदार सुरेश भोळे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आयोजित केली होती. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शहरातील कामांची माहिती घेतली.

नंतर त्यांनी रस्त्यांची कामे होत असताना सावजनिक बांधकाम विभाग व महापालिका अभियंत्यांनी उपस्थित राहावे, असे आदेश दिले. शहरातील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असली, तरी त्याची जबाबदारी महापालिकेच्या अभियंत्यांचीही आहे. त्यामुळे कामांबाबत त्यांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्याचे काम करताना जलवाहिनी जोडण्याचा निर्णय अगोदर घ्यावा. त्यामुळे तयार झालेले रस्ते खोदण्याची आवश्‍यकता पडणार नाही. दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने हे काम करावे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे करावीत, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

"शहरातील रस्त्यांसाठी निधी आणण्याचे काम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करीत आहोत. मात्र, ते काम करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. कामे वेगाने होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आपण लावली होती. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे आता कामे वेगात होण्याची अपेक्षा आहे." -सुरेश भोळे, आमदार, जळगाव शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT