Panchnama Sakal
जळगाव

पंचनामे करताना पैशांची मागणी केल्यास तक्रार करा

जिल्ह्यात ११५ विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना कोणी पंचनाम्यासाठी पैशांची मागणी केल्यास संबंधितांची थेट कृषी विभागाकडे तक्रार करा, जिल्ह्यात ८० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापक अतुल झनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कृषी उपसंचालक अनिल भोकरे, सहाय्यक व्यवस्थापक नितीन कुमार, जिल्हा प्रतिनिधी कुंदन बारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात लोकप्रतिनिधींकडे शेतकरी तक्रार करतात, की विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनाम्यासाठी पैसे घेतात. मात्र शेतकरी लेखी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी नुकसानीचा फोटो (जिओ टॅगिंग) काढून तो कंपनीकडे पाठवावा. जिल्ह्यात ११५ विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करीत आहे. २० जूनपर्यंत स्पॉट पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती दिली.

बियाणे, खतांची टंचाई नाही

जिल्ह्यात सर्व प्रकारच्या बियाणे, खतांची उपलब्धता आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. शेतकऱ्यांना कोणी टंचाई आहे, असे सांगत असेल तर त्याची कृषी विभागाकडे तक्रार करावी, त्याची नावे गुप्त ठेवण्यात येतील असे श्री. ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT