Hotels are target of Thieves esakal
जळगाव

Jalgaon Crime Update : हॉटेल्स चोरट्यांचे लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा

भडगाव : शहरातील मेनरोडवरील संकुलासह इतर पाच ते सहा दुकाने व हॉटेलवर बुधवारी (ता. १२) रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. यात मोबाईल व कापड दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून कपडे, वस्तूंसह काही रक्कम असा २६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत दुकानमालक शुभम संजय जैन (रा. पूर्णपात्रे गल्ली, ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जैन यांच्या रेडिमेड कपड्यांच्या दुकानातून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे जिन्स पॅंट, शर्ट व दुकानातील काऊंटरमधून तीन हजार रुपये लंपास केले.(Crime Update Hotels are the target of thieves jalgaon crime news)

तसेच आबा देवराम धनगर यांच्या माऊली जनरल स्टोअर्स या दुकानातून ३ हजार रुपये किमतीचे स्कूलबॅग व इतर सामान तसेच दुकानातील काऊंटरमधून ५ हजार रुपये चोरीस गेलेले आहेत.

या मेनरोडलगत अजून काही दुकानांवर चोरीचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. तसेच पाचोरा रस्त्यालगत आनंदा जगन्नाथ महाजन यांच्या हॉटेलमधून ७७० रुपये किमतीचे सिगारेटचे पाकीट, पान, ७० रुपये चोरीस गेलेले आहेत. असा सर्व दुकानदारांचे मिळून २६ हजार ७७० रुपये किमतीच्या वस्तूंसह किरकोळ रोख रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोरीच्या घटना सकाळी उघडकीस आल्या आहेत. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या आदेशान्वये पोलिस कर्मचारी विलास पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT