अतिवृष्टीने पिकांचे नुकसान  sakal
जळगाव

Jalgaon News : अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान; कृषी विभागाचा अंदाज

सकाळ वत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात आठ व नऊ आणि पंधरा ते सतरा सप्टेंबर या पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील आठ तालुके बाधित झाले असून, तब्बल अडीच हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यातून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर होते. सप्टेंबरमध्ये मात्र वरूणराजाची पुन्हा कृपा झाली. (Damage to crops on 2500 hectares due to heavy rain jalgaon news)

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाचोरा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव, जामनेर, चोपडा, जळगाव या आठ तालुक्यांत पाच दिवसांत अतिवृष्टी झाल्याने पुर परीस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला.

केळी पिक अक्षरश: झोपले

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका केळी पिकाला बसला आहे. यासोबतच ज्वारी, तुर, सोयाबीन, भाजीपाला, मका आणि कापूस पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यांत १५२ गावांतील ३ हजार ३६१ शेतकरी बाधित झाले असून, एकूण २ हजार ४९८.६० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत झालेल्या नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी माहिती घेतली असून, या भागातील शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Latest Marathi News Live Updates: अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पुलावरुन पाणी

SCROLL FOR NEXT