Ayushman Bharat news esakal
जळगाव

Jalgaon : ‘आयुष्यमान भारत’ ला 4 वर्षे पूर्ण; लाभार्थ्यांना Health-Card

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आयुष्यमान भारत योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला चार वर्षे पूर्ण होतअसल्याने शुक्रवार (ता. २३) आयुष्यमान दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. तसेच राज्यात १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयुष्यमान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यात आरोग्य शिबिरे होणार असून, लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.

आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांमार्फत जिल्ह्यामध्ये विविध रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांमध्ये एकत्रित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना कसा घेता येईल, याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (Health Card distribution to beneficiaries Ayushman Bharat completes 4 years Jalgaon news)

तसेच मोफत तपासणी, रुग्णांना त्यांचे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट व ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत योजनेचे पत्र आहे, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे. या पंधरवड्यात संबंधित योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिबिर साखळीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण ४० रुग्णालये समाविष्ट आहेत. तरी या आरोग्य शिबिराचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. वसीम शेख, विभागप्रमुख डॉ. सुमीत जैन, जिल्हा समन्वयक रोहित कारंडे, जिल्हाप्रमुख डॉ. अनुराधा वाडिले व सर्व आरोग्यमित्र यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT