transformer farmer sakal
जळगाव

पाण्याविना पिके कोमेजली; महावितरण म्‍हणतेय बिले भरा तर रोहित्र

पिके पाण्याविना लागली कोमेजू; महावितरण म्‍हणतेय बिले भरा तर रोहित्र

सकाळ डिजिटल टीम

पारोळा (जळगाव) : पळासखेडे बु. (ता. पारोळा) येथील दहा ते पंधरा शेतकऱ्यांचे शेत राजवड शिवारात आहे. शेतकऱ्यांनी (Farmer) शेतात कारले, भरीताचे वांगे व भुईमुग पिके लागवड केली आहे. तर काही जणांनी मे महिन्यातील कपाशी लागवडची मशागत (Mahavitaran) पुर्ण केली आहे. मात्र गेल्या वीस दिवसांपासून रोहित्र नादुरुस्त झाल्याने पिके पाण्यावाचून कोमेजू लागले आहेत. (breakdown in the transformer farmer pending bill submit mahavitaran action)

शेतकऱ्यांनी रोहित्र दुरुस्तीची मागणी केल्यावर अगोदर बिले भरा तरच रोहित्र मिळेल? असे धोरण महावितरणचे असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. रोहित्र दुरुस्तीबाबत कोण शेतकऱ्यांची बाजु मांडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजवड शिवारात रतन शिंदे, विनोद पाटील, आनंदा शिंदे, संतोष लोहार, मधुकर पाटील, राजेंद्र मराठे, सुकदेव शिंदे यांचेसह अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. संबंधित शेतकऱ्यांनी शेतात कारले, भरीत वांगे व भुईमुग पिके आहेत. मात्र गेल्या वीस दिवसांपासून पाण्याअभवी पिके ऊन धरु लागल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.

बिल भरणे झाले अनिवार्य

नवीन नियमानुसार महावितरणचे जाँईट मँनेजिंग डायरेक्टरच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानची चालू बिले संबंधित शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांनी भरली तर नवीन रोहित्र किंवा दुरुस्तीबाबत विचार केला जात असतो. यामुळे बिल भरणे अनिवार्य असल्याचे महावितरणकडुन सांगण्यात आले.

शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट

गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मालाला योग्य भाव मिळत नसल्याने जमीन परवडीनाशी झाली आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे बिले भरावी की मान्सुनपुर्व मशागत व शेतात मे महिन्याची लागवड करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असुन याबाबत लोकप्रतिनिधी यांनी मार्ग काढुन रोहित्र दुरुस्ती किंवा नवीन याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

रोहीत्र जळाल्याने विहीर पाणी असुन देखील विजअभावी पिकांना पाणी दिले जात नसल्याने शेतकर्यांपुढे द्विधामनस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे शेतकरी पुर्णपणे भरडला गेला आहे.महावितरण कंपनीने रोहीत्र बसवुन सहकार्य करावे

- राजेंद्र मराठे, शेतकरी, पळासखेडे बु. ता.पारोळा

महावितरणचे नवीन आदेशानुसार शेतकर्यांनी चालु थकबाकी भरावी.संबंधित शेतकर्यांपैकी 80 टक्के शेतकरी यांनी बिले भरल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतरच रोहीत्र बाबत संबंधित अधिकारी विचार करतील.यासाठी शेतकर्यांनी सप्टेंबर ते डिसेंबर महीन्याची करंट बिले भरुन महावितरणला सहकार्य करावे

- निसार तडवी, शाखा अभियंता, मोहाडी कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT