जळगाव

दातृत्‍व..स्‍वबळावर उभे राहण्यासाठी कुटुंबाला शेळ्या भेट

सकाळ डिजिटल टीम

शहरातील काही दात्यांच्या मदतीतून गरीब कुटुंबाला स्वबळावर उभे राहण्यासाठी शेळ्या देण्यात आल्या.

चाळीसगाव (जळगाव) : एकाच कुटुंबातील तीन दिव्यांग मुलांसह त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कायमचा सुटावा, यासाठी येथील स्वयंदीप संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शहरातील काही दात्यांच्या मदतीतून गरीब कुटुंबाला स्वबळावर उभे राहण्यासाठी शेळ्या देण्यात आल्या. (chalisgaon-swayamdeep-sanstha-Goat-gift-family-to-stand-on-their own)

पातोंडा (ता. चाळीसगाव) येथील भिल्ल समाजातील प्रभात भिल व कदमबाई भिल यांना तीन अपत्ये असून तिन्हीही अपंग आहेत. पती-पत्नी हातमजुरी करून आपल्या मुलांचे संगोपन करतात. कोरोनाच्या काळात या कुटुंबीयांचा दररोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला होता. तब्बल दीड वर्षांपासून या कुटुंबाचे खूप हाल होत होते. तीन मुलांपैकी मोनाली या मुलीचे वय २४ असले तरी तिची शारीरिक वाढ केवळ सात ते आठच वर्षे झाल्याने तिचे संपूर्ण शरीर लुळे पडले आह. तिचे बोलणे मात्र चांगले आहे. दुसरा मुलगा विरु हा १७ तर तिसरा मुलगा ११ वर्षांचा आहे. त्यांचीची बहिणीसारखीच अवस्था असल्याने त्यांची आईच त्यांचे सर्व आवरते.

घरात अठरा विश्‍वे दारिद्र्य असल्याने मुलांच्या दवाखान्याचा खर्च करणे त्यांना अशक्य आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना मोलमजुरी देखील मिळत नसल्याने तीन दिवस संपूर्ण कुटुंब उपाशी होते. ही माहिती गावातील एकाने मीनाक्षी निकम यांना दिल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मदतीचे आवाहन केले. त्यानुसार समाजातील अनेकांनी आपापल्या परीने किराणासह इतर जीवनावश्‍यक साहित्यांची मदत केली. फौजी ग्रुपने या कुटुंबीयांच्या झोपडीला पत्रे उपलब्ध करुन दिली.

शेळ्या दिल्या भेट

मीनाक्षी निकम यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, कळमडू (ता. चाळीसगाव) येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे संगणक अभियंता असलेले गुणवंत सोनवणे, रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव मिल्कसिटीचे माजी अध्यक्ष रवींद्र शिरुडे यांच्यासह आनंदीबाई बंकट हायस्कूलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला. या सर्वांच्या योगदानातून तिन्ही दिव्यांग भावडांच्या कुटुंबीयांना त्यांचा दररोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कायमचा सुटावा, यासाठी दहा बकर्या व एक बोकड दिला. यावेळी ‘स्वयंदीप’च्या संचालिका भारती चौधरी, रवींद्र शिरुडे, संजय पाटील, नगरसेविका सविता राजपूत यांच्यासह पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

नको असलेले आम्हाला द्या

चाळीसगावची स्वयंदीप संस्था कुटुंबात नको असलेल्या अपंग मुलींना सांभाळून त्यांना पुनर्जीवन देते. अशा मुलींना विविध कलेचे प्रशिक्षण देऊन मीनाक्षी निकम यांनी स्वावलंबी बनवले होते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु आहे. सर्वसाधारणपणे या दिवसात अनेक जण घरातील अडखळ सामान फेकून देतात. जुने कपडे, नको असलेले कपडे, वस्तू, काहीही फेकून न देता ते आम्हाला द्या, आम्ही मुलींना टाकाऊपासून टिकाऊ अशा विविध कलेचे प्रशिक्षण देतो, तुमची ही मदत टाकाऊ असली तरी लाख मोलाची आहे, साड्या, मुलांचे, माणसांचे जुने कपडे, तुटलेली शो पीस, वस्तू काहीही असो, रद्दी असो प्लास्टिक आम्ही ते योग्य उपयोगात आणू. त्यामुळे तुम्हाला जे जे नको आहे, ते आम्हाला द्या असे आवाहन मीनाक्षी निकम यांनी केले आहे. (chalisgaon-swayamdeep-sanstha-Goat-gift-family-to-stand-on-their own)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT