Girna Dam
Girna Dam 
जळगाव

गिरणा धरणाने शंभरीची केली 'हॅट्रीक'; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

सुधाकर पाटील

भडगाव : गेल्या काही दिवसापासून गिरणा धरण (Girna Dam) पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस (Heavy Rain) होत असल्याने गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा येत होता. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी गिरणा धरणाने आज सकाळी सात वाजता शंभरी गाठली. त्यामुळे गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये (Farmers Happy) आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून धरणातून सध्या 7500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ' ला माहिती दिली.

गिरणा धरणाने सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रातील धरणातुन मोठ्याप्रमाणात पाणीसाठा आल्याने रात्रीतुन 6 टक्के पाण्याचा साठा धरणात वाढला. सात वाजता सुरवातीला चार गेट एका फुटाने वर करण्यात आले. यातून पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होत होता. मात्र पुन्हा धरणात पाण्याचा प्रवाह वाढल्याने सात दरवाजे उघडून साडेसात हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ज गिरणा नदीत सुरु करण्यात आला.

Girna Dam

गिरणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

आज सकाळ पासून गिरणा नदी पात्रात सुमारे साडे सतरा हजार क्युसेकने पाण्याचा विर्सग होत आहे. त्यामुळे गिरणा नदीत पाण्याचा मोठा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अग्रवाल, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस.आर.पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT