Agriculture Minister Dada Bhuse Inspection of damaged area 
जळगाव

कृषी मंत्री दादा भुसेंनी चाळिसगाव अतिवृष्टी भागाची केली पाहणी

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात चाळीसगावमध्ये झालेल्या अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

भूषण श्रीखंडे

जळगाव ः जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात चाळिसगाव व जामनेर तालुक्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) झाले. त्यात अनेक शेतजमीन वाहून गेल्या. या पार्श्वभूमीवर आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी नुकसान ग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील भागाची सकाळी पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेले ठिकाणांचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे सुचना अधिकाऱ्यांना दिल्या तसेच सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून त्यांना तातडीने मदत देण्याचा आश्वासन यावेळी दिले.

जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात चाळीसगावमध्ये झालेल्या अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात नदी, नाल्यांच्या काठावरील जमिनी खरडून गेल्या आहे. त्यामुळे शेतातील पिके पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. याबाबत आज राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी चाळीसगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त गावांमधील शेतात जावून पाहणी केली. यावेळी आमदार किशोर पाटील, आमदार मंगेश चव्हाण व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

पंचनामे तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना

यावेळी माध्यमांशी बोलतांना मंत्री दादा भुसे म्हणाले, की चाळिसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने नद्यांना व नाल्यांना मोठा पुर आला. त्यामुळे नद्या व नाल्या लगतच्या शेती पुराच्या पाण्यामुळे खरडून निघाल्या व शेतात घुसलेल्या पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने घरांचे व पशुधनांचे देखील नुकसान झाले. या सर्व नुकसानाची तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. त्यानुसार त्वरीत मदत शासनाकडून दिली जाणार असे दादा भुसे यांनी सांगितले.

आघाडीतील मंत्र्यांनी भेट दिली..पण मदत नाही

अतिवृष्टी भागात आघाडी सरकार मधील मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेते नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून गेले. मात्र अद्याप शेतकरी व नुकसानग्रस्तापर्यंत नागरिकांपर्यंत मदत मिळालेली नाही. तसेच घोषणा देखील अद्याप झालेली नाही. याचा मुळ कारण पंचनामे संथगतीने सुरू असल्याचे आरोप कृषी मंत्र्याकडे गावकऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT