Girna River
Girna River 
जळगाव

गिरणापात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : सध्या कमी पाऊस असल्याने सरपंचांसह शेतकऱ्यांनी (Farmers) केलेल्या मागणीची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांनी निर्देश दिल्यानंतर गिरणा नदीपात्रातून (Girna River) पुराचे वाहून जाणारे पाणी दहीगाव आणि जामदा बंधाऱ्यातील कालव्यांच्या माध्यमातून सोडले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, नागरिकांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गिरणा धरणात (Girna Dam) चांगला पाणीसाठा होता.

यंदा ऑगस्ट महिना संपत आला, तरी गिरणा धरणात फक्त ४५ टक्के जलसाठा आहे. दरम्यान, धरणाच्या खालील भागातील बंधाऱ्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पात्रात पुराच्या स्वरूपात वाहून जाते. यामुळे हे पाणी जामदा आणि दहीगाव बंधाऱ्यांना लागून असणाऱ्या कालव्यांच्या माध्यमातून परिसरात सोडण्यात येते. यंदा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंतित झाले आहेत. यामुळे विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पालकमंत्री पाटील यांना गिरणा बंधाऱ्यांच्या कालव्यांमधून पाणी सोडण्यासाठी साकडे घातले होते. त्यांनी याची तातडीने दखल घेऊन गिरणा विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांना याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या अनुषंगाने जामदा आणि दहीगाव बंधाऱ्यांमधून कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आले.

जामदा बंधाऱ्यातील पाण्यामुळे बहाळ, कोळगाव, भडगाव व आमडदेसह परिसराला, तर दहीगाव बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे जळगाव, एरंडोल, धरणगाव आणि अमळनेर तालुक्यातील गावांना लाभ होणार आहे. यात प्रामुख्याने दापोरा, खेडी, रिंगणगाव, कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, पाळधी, पथराड, फुलपाट, झुरखेडा, दोनगाव, चांदसर, पिंपळगाव, वराड, हिंगोणा, पिंप्री, अमळनेर तालुक्यांतील पातोंडा, जळोद, कलालीसह इतर गावांना लाभ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे, यासाठी रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी साकडे घातले जात होते. सोडलेल्या पाण्यामुळे छोट्या नाल्या-ओढ्यात पाणी वाहून विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढेल. धरणगाव, एरंडोल, अमळनेर तालुक्यातील ७० ते ८० गावांना फायदा होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT