Accident
Accident 
जळगाव

हसत खेळत घरातून निघालेल्या युवकांच्या मृत्यूने सुळे गावावर शोककळा

सचिन पाटील

शिरपूर : दिवाळीसाठी कपडे घेऊन येतो असे सांगून हसतखेळत घरातून निघालेल्या युवकांचे छिन्नविच्छिन्न मृतदेह (Accident Death) बघून नातलगांना शोक अनावर झाला. काहींना तर जागीच भोवळ आली. काही वेळातच आक्रोशाने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचा (Hospital) परिसर भरून गेला.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 27 ऑक्टोबरला रात्री साडेआठला आठ वाहने एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात चारजण ठार तर दोन गंभीर जखमी झाले. मृत सचिन संपत गांगुर्डे, शिवा रामदास गांगुर्डे, राजू सीताराम गांगुर्डे व रामदास सोमनाथ दळवी कळवण तालुक्यातील सुळे पिंपळे येथील रहिवासी आहेत. घटनेचे वृत्त कळताच सुळे गावावर शोककळा पसरली. मृतांचे नातलग रात्री उशिरा शिरपुरात दाखल झाले.

भावंडे दगावली

मृत गांगुर्डे कुटुंबातील युवक  एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. मृत रामदास दळवी शिवा गांगुर्डेचा मेव्हणा होता. शिवाचे वडील रामदास गांगुर्डे यांना एकुलता मुलगा आणि जावयाचे मृतदेह पाहून भोवळ आली. मृत राजूचा भाऊ धोंडीराम याने हंबरडा फोडला. त्यांचा शोक पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. त्यांच्यासोबत आलेले पोलिस पाटील पांडूरंग गांगुर्डे यांनी सांत्वन केले.

कपडे घेऊन येतांना अपघात

गांगुर्डे कुळांची बहुसंख्या असलेल्या सुळे पिंपळे गावात मृतांचे सर्वाधिक मोठे कुटुंब आहे. सर्वांना शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. त्यातील राजू गांगुर्डे याचे जयदर (ता.कळवण) येथे तयार कपडे विक्रीचे दुकान आहे. दिवाळीत माल भरण्यासाठी तो सेंधवा येथे जाण्यासाठी निघाला. शिक्षक असलेला चुलतभाऊ कांतीलाल गांगुर्डे याची मारुती बॅलेनो कार त्याने मागून घेतली. त्याच्यासोबत अन्य दोन चुलतभाऊ व मेव्हणेही निघाले. कपड्यांचे नमुने घेऊन परत येत असतांना झालेल्या भीषण अपघातात चौघेही ठार झाले.

कर्त्या युवकांचा मृत्यू

मृत सचिन पुणे येथे पदवीच्या द्वितीय वर्षात तर शिवा पदव्युत्तर शिक्षण घेत होता. दोघेही कुटुंबात एकुलते होते. रामदास दळवी शेतकरी होते. राजूचा नुकताच जून महिन्यात विवाह झाला होता. एकाच अपघातात चार कर्त्या युवकांचा मृत्यू झाल्याने सुळे पिंपळे गावावर शोकसावट पसरले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह घेऊन नातलग गावी रवाना झाले. तहसीलदार आबा महाजन, सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी औपचारिक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देऊन सहकार्य केले.

अपघातानंतर तर्कवितर्क

काही सेकंदात तीन कार आणि पाच ट्रक एकमेकांना धडकल्याने हा अपघात नेमका कोणामुळे झाला असावा याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. अपघातस्थळ निर्जन असल्यामुळे व उतारावर वेग नियंत्रणाच्या प्रयत्नात चालक गुंतल्यामुळे अपघात कसा घडला याबाबतही कोणी ठोस माहिती दिली नाही. मात्र उतारावरुन खाली येतांना ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले असावे व त्याच ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बॅलेनो दोन ट्रक्सच्या मध्ये चेपली गेली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT