farmer in tension in jalgaon because of no rain
farmer in tension in jalgaon because of no rain esakal
जळगाव

Jalgaon : पाऊस गायब... जूनचा पंधरवडा कोरडाच!

सचिन जोशी

जळगाव : जून महिन्यातील मृग नक्षत्रात पाऊस झाला तर शंभर टक्के पेरण्या होऊन उत्पादनही चांगले येते. मात्र गेल्या तीन वर्षात मृग नक्षत्रात पाऊस (Rain) झालेला नाही. गेल्या तीन वर्षात पाऊस कधी लवकर, कधी उशिरा येतो अन्‌ पेरण्यांनंतर पावसाचा खंड पडतो. यंदाही जूनचा पंधरवडा उलटला तरी दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आकाशाकडे लागले आहेत. रविवारी पाऊस झाला. तो पाऊण तास बरसला. नंतर मात्र पाऊस बेपत्ता झाला तो अद्यापही आलेला नाही. (no heavy rain during Monsoon in jalgaon News)

सात जूनला मृग नक्षत्र सुरू होते. यादिवशी पाऊस झाला तर पेरण्यांना वेग येतो. शेतकरी दोन दिवसात दहा जूनपर्यंत पेरण्या पूर्ण करतो. या नक्षत्रात आलेला पाऊस चांगला हंगाम देणारा ठरत असल्याचे जुने जाणकार सांगतात. असा पाऊस तीन वर्षापूर्वी झालेला नाही. नंतर कधी लवकर तर कधी उशिरा मॉन्सूनचे आगमन होत असल्याचे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.

कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरण्यांची सर्व तयारी पूर्ण केली आहे. पेरणीसाठी चऱ्याही पाडून ठेवल्या आहेत. आता प्रतिक्षा आहे ती पावसाची. १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दमदार पावसाची चातकासारखी वाट शेतकरी पहात आहे. हवामान विभागाने यंदा २९ जूनलाच मॉन्सून बरसणार असे सांगितले होते. आज बारा दिवस उलटले तरी पाऊस नाही. सध्या दिलेल्या अंदाजानुसारही पाऊस येत नसल्याचे चित्र आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा अंदाज घेत पेरण्या करतो. हवामान विभागावर मोठा विश्‍वास शेतकऱ्यांचा असतो. तो अंदाज हवामान खरा ठरण्यासाठी हवामान विभागाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे, असे मत शेतकरी किशोर चौधरी यांनी व्यक्त केले.

पावसाळी बाजारपेठेत शुकशुकाट
पाऊस पडताच पेरण्याकरून खते देण्यासाठी शेतकरी खतांची खरेदी करतो. कोट्यवधी रुपयांची उलाढाल खतांच्या बाजारपेठेत होते. ही बाजारपेठ जून महिना सुरू होवूनही शांत-शांत आहे. बियाणे, खते विक्रेत्यांना पाऊस पडल्यानंतर बोलायला वेळ नसतो एवढे ग्राहक त्यांच्याकडे असतात. पावसाळी रेनकोट, छत्र्या, टोपी, महिलांसाठीचे वेगळे रेनकोट, लहान बालकांसाठी वेगळ रेनकोट यांना प्रचंड मागणी असते. या वस्तूंच्या बाजारपेठेतही शुकशुकाट आहे.

"पावसाची सर्वच जण प्रतिक्षा करीत आहे. पेरण्या उशिराने होतील, असे असले तरी उत्पादनावर परिणाम होणार नाही. शेतकऱ्यांनी पेरण्या करतानाच खतांचीही मात्रा द्यावी. पेरण्या झाल्यानंतर खते देण्याचा हवा तसा फायदा होत नाही."-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT