Revenue Officer Transfers sakal
जळगाव

महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या सप्टेंबरमध्ये? राज्यातील सत्तांतराचा फटका

प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने जून अखेरपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी मे अखेरीस होतात. यंदाही त्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने जून अखेरपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली. मात्र, आता तर राज्यात सत्तांतरच झाले आहे. यामुळे बदल्यांना मुहूर्त नवीन पालकमंत्री जाहीर झाल्यानंतरच होईल. सप्टेंबर महिन्यात बदल्या होण्याचे संकेत आहेत. (Latest Marathi News)

गतवर्षी कोरोनामुळे संभाव्य महसूल बदल्यांना स्थगिती दिली होती. नंतर मात्र सप्टेंबरमध्ये बदल्या झाल्या होत्या. आता जिल्ह्यातील तब्बल २० अधिकारी बदलीस पात्र आहेत. अनेकांनी बदल्यांसाठी मार्च महिन्यापासूनच फिल्डींग लावली आहे. ते बदल्यांसाठी ताटकळत आहेत. त्यांना पाल्यांना संबंधित बदलीच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे. बदल्यांसाठी त्यांनी संबंधित ठिकाणच्या तत्कालीन पालकमंत्री, मंत्रालयात फिल्डींग लावली होती. मात्र, आता राज्यात सत्तांतरच झाल्याने लावलेली फिल्डींग वाया जाण्याची शक्यता आहे. कारण बदल्यापूर्वीचे पालकमंत्री व सत्तांतरानंतरचे पालकमंत्री वेगळे असण्याची शक्यता आहे. यामुळे फिल्डींग लावणारे गोंधळात पडले आहेत. तेही नवीन मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत आहेत. केव्हा एकदाचा मंत्रिमंडळ विस्तार होतो अन्‌ बदल्यांची प्रक्रिया सुरू होते, असे त्यांना झाले आहे.

बदल्या कोणाच्या?

जळगाव जिल्ह्यात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्या आहे अन्‌ ज्यांनी हा कालावधी पूर्ण होऊन विनंती बदल्यासाठी अर्ज केला आहे. किंवा ज्यांनी पती-पत्नी एकत्रीकरण योजनेनुसार अर्ज केला आहे किंवा प्रशासकीय कारणावरून बदल्या होणार आहेत. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बदल्या झाल्या होत्या. आताही तेव्हाच बदल्या होतील, असे सांगितले जात आहे.

पाल्यांचा शैक्षणिक प्रश्‍न नाहीच

मे महिन्यात बदल्या झाल्या, तर जून महिन्यात पाल्यांना शाळेत, महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सत्रापासून जाणे सुकर होते. यामुळे मे अखेरीस बदल्यांची प्रक्रिया होते. मात्र, अधिकारी कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्यात गेला, तरी बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी पाच टक्के जागा सर्वच शैक्षणिक संस्था राखीव ठेवतात. यामुळे बदली केव्हाही झाली, तरी अधिकाऱ्यांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT