Revenue Officer Transfers sakal
जळगाव

महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या सप्टेंबरमध्ये? राज्यातील सत्तांतराचा फटका

प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने जून अखेरपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी मे अखेरीस होतात. यंदाही त्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना, तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने जून अखेरपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली. मात्र, आता तर राज्यात सत्तांतरच झाले आहे. यामुळे बदल्यांना मुहूर्त नवीन पालकमंत्री जाहीर झाल्यानंतरच होईल. सप्टेंबर महिन्यात बदल्या होण्याचे संकेत आहेत. (Latest Marathi News)

गतवर्षी कोरोनामुळे संभाव्य महसूल बदल्यांना स्थगिती दिली होती. नंतर मात्र सप्टेंबरमध्ये बदल्या झाल्या होत्या. आता जिल्ह्यातील तब्बल २० अधिकारी बदलीस पात्र आहेत. अनेकांनी बदल्यांसाठी मार्च महिन्यापासूनच फिल्डींग लावली आहे. ते बदल्यांसाठी ताटकळत आहेत. त्यांना पाल्यांना संबंधित बदलीच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे. बदल्यांसाठी त्यांनी संबंधित ठिकाणच्या तत्कालीन पालकमंत्री, मंत्रालयात फिल्डींग लावली होती. मात्र, आता राज्यात सत्तांतरच झाल्याने लावलेली फिल्डींग वाया जाण्याची शक्यता आहे. कारण बदल्यापूर्वीचे पालकमंत्री व सत्तांतरानंतरचे पालकमंत्री वेगळे असण्याची शक्यता आहे. यामुळे फिल्डींग लावणारे गोंधळात पडले आहेत. तेही नवीन मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत आहेत. केव्हा एकदाचा मंत्रिमंडळ विस्तार होतो अन्‌ बदल्यांची प्रक्रिया सुरू होते, असे त्यांना झाले आहे.

बदल्या कोणाच्या?

जळगाव जिल्ह्यात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्या आहे अन्‌ ज्यांनी हा कालावधी पूर्ण होऊन विनंती बदल्यासाठी अर्ज केला आहे. किंवा ज्यांनी पती-पत्नी एकत्रीकरण योजनेनुसार अर्ज केला आहे किंवा प्रशासकीय कारणावरून बदल्या होणार आहेत. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये बदल्या झाल्या होत्या. आताही तेव्हाच बदल्या होतील, असे सांगितले जात आहे.

पाल्यांचा शैक्षणिक प्रश्‍न नाहीच

मे महिन्यात बदल्या झाल्या, तर जून महिन्यात पाल्यांना शाळेत, महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सत्रापासून जाणे सुकर होते. यामुळे मे अखेरीस बदल्यांची प्रक्रिया होते. मात्र, अधिकारी कोणत्याही जिल्ह्यात, तालुक्यात गेला, तरी बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी पाच टक्के जागा सर्वच शैक्षणिक संस्था राखीव ठेवतात. यामुळे बदली केव्हाही झाली, तरी अधिकाऱ्यांच्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

पाकिस्तानचे प्रेक्षकही पलटले! संघ हरतोय दिसताच हिरव्या जर्सीवर चढवली टीम इंडियाची जर्सी; Viral Video

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

...अन् आईचे अश्रू बदलले आनंदाश्रूत, नऊ महिन्यांच्या बाळाने गिळलेली सेफ्टी पिन डॉक्टरांनी काढली बाहेर

SCROLL FOR NEXT