माणगाव : निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, ग्रामविकास अधिकारी पाटणे, पोलिस पाटील, कोस्ते बुद्रुक ग्रामस्थ, तसेच जेटीएल कंपनीचे व्यवस्थापक यांनी दूषित पाणी प्रक्रिया करणार्!या प्लांटची पाहणी केली.
माणगाव : निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, ग्रामविकास अधिकारी पाटणे, पोलिस पाटील, कोस्ते बुद्रुक ग्रामस्थ, तसेच जेटीएल कंपनीचे व्यवस्थापक यांनी दूषित पाणी प्रक्रिया करणार्!या प्लांटची पाहणी केली.  
कोकण

शेकडो गावातील नागरिकांना प्यावे लागते रासायनिक पाणी; या कंपनीला ग्रामपंचायतीकडून नोटीस

संतोष सुतार

माणगाव : निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोस्ते बुद्रुक गावाजवळील जेटीएल कंपनीचे रासायनिक दूषित सांडपाणी व्यवस्थापनाकडून काळनदीत सोडले जाते. यामुळे त्या नदीवर अवलंबून असणाऱ्या निजामपूर ग्रामपंचायतीसह तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय शेकडो गावातील नागरिकांनाही हेच दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबत ग्रामस्थ संतप्त झाले असून, निजामपूर ग्रामपंचायतीनेही या गंभीर प्रकरणात लक्ष घातले असून कंपनीला प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली आहे. 

जीटीएल कंपनी निजामपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू आहे. या कंपनीचे दूषित रासायनिक पाणी थेट काळ नदीच्या पात्रात सोडले जाते. त्याच नदीवर निजामपूरसह तीन गावांच्या पाणीपुरवठा योजना असल्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे निजामपूर ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ रणपिसे, पोलिस पाटील, ग्रामविकास अधिकारी पाटणे, तसेच कोस्ते बुद्रुक बौद्धवाडीतील ग्रामस्थ यांनी मंगळवारी (ता. 25) तत्काळ जीटीएल कंपनीला भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी रणपिसे यांनी कंपनीतून सोडण्यात येत असलेले दूषित पाणी तत्काळ बंद करण्याच्या लेखी व तोंडी सूचना देत कंपनीला निजामपूर ग्रामपंचायतीच्यावतीने नोटीस बजावली. तसेच जोपर्यंत कंपनी दूषित केमिकल पाण्याची विल्हेवाट आपल्या जागेत लावत नाही. तोपर्यंत हा प्लांट सुरू करू नये, असेही कंपनी व्यवस्थापनाला कळवले आहे. या संदर्भात कंपनीचे व्यवस्थापक शर्मा यांनी हा प्लांट बंद ठेवण्याचे मान्य केले असून त्यानुसार कंपनीने प्लांट बंद केला आहे. 

याबाबत रायगडचे खासदार सुनील तटकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रायगड पालकमंत्री, उद्योगमंत्री अदिती तटकरे, महाड-पोलादपूर आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरी, माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर, माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे कांबळे, तसेच माणगाव पोलिस उपविभागीय अधिकारी शशीकिरण काशिद यांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

सरकारने त्वरित कारवाई करावी 
काळ नदी पात्रावर माणगावसह गोरेगावपर्यंतच्या शेकडो ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना असल्याने त्याचा परिणाम तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर होणार असून, हजारो नागरिकांना या कंपनीचे रासायनिक दूषित सांडपाणी प्यावे लागत आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या निजामपूरसह शेकडो ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना साथीची रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याला जीटीएल कंपनी जबाबदार असून, या कंपनीवर सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी निजामपूर ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी केली आहे. 

प्रदूषण मंडळ गप्प का? 
प्रदूषण मंडळाचे संबंधित अधिकारी याबाबत गप्प का आहेत? असा मार्मिक सवाल रणपिसे यांनी केला आहे. तसेच प्रदूषण मंडळाने या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. 

याप्रकरणी शहानिशा करून संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- जगन्नाथ साळुंखे, रायगड जिल्हा प्रदूषण नियंत्रण अधिकारी

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT