china made literature konkan sindhudurg 
कोकण

जगभर चिनचा विरोध; पण गणेशोत्सवात `चायना मेड`चा मोह

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग) - भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंनी हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर "मेड इन चायना'वर बहिष्कार घालण्यात आला. काही राजकीय पक्षांनी चिनी बनावटीच्या वस्तूंची होळीही केली; पण गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर "मेड इन चायना'चा मोह भारतीय नागरिकांना काही आवरता आला नसल्याचे चित्र बाजारपेठेत पहायला मिळाले. 

गलवान सीमेवरील भारतीय सैनिक शहीद झाल्याच्या घटनेनंतर भारत- चीन या दोन देशांमधील तणाव वाढलेला आहे. कोरोना संसर्गजन्य आजार हा चीनच्या वुहान शहरांमधून जगभरात पसरला. यामुळे संपूर्ण देशात आणि जगातही चीन विरोधात लाट उभी होती. यामुळे भारतीय नागरिक संतप्त झाले होते. चारबंदीच्या कालावधीमध्ये अनेकांनी हा संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्तही केला होता.

यापुढे चिनी बनावटीच्या वस्तू वापरणार नाहीत. अशा आणाभाका घेतल्या होत्या; पण भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या चिनी बनावटीच्या वस्तू या ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. विशेष म्हणजे हिंदूंच्या सगळ्याच सणासाठी लागणाऱ्या वस्तू या चीन देशातून आयात केल्या जातात. सामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या या वस्तू ग्रामीण भागातील बाजारपेठ पर्यंत केव्हाच पोहचल्या आहेत. चीनच्या विरोधात कितीही टाहो फोडला तरी ग्राहकांच्या पसंतीला आणि मागणीला व्यावसायिकांचा पुरवठाही सुरू झाला आहे.

सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेचा आढावा घेतला तर इलेक्‍ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या आहेत. यात मोबाईल आणि साऊंड सिस्टमचा भरणा अधिक आहे. इलेक्‍ट्रिकमध्ये विविध प्रकारचे बल्ब असो किंवा विविध रंगांच्या विजेच्या तोरण माळेला मागणी आहे. याचबरोबर शोभेच्या वस्तूही दाखल झाल्या आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या भावात या वस्तू उपलब्ध होत असल्याने निश्‍चितच मागणीही कायम आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तूला आजही ही चिनी बनावटीच्या वस्तू प्रतिस्पर्धी ठरत असल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा तिव्र विरोधानंतरही पुढे आले आहे. 

कौशल्य विकासाची गरज 
केंद्र सरकारने तरूणांना कौशल्य विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षित केले; पण आवश्‍यक भांडवल तरूणांकडे नसल्याने छोटे उद्योग उभे राहिले नाहीत. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिकांना आत्मर्निभरतेचा नारा दिला; पण सरकारच्या या घोषणा केवळ कागदावरच्या आहेत. सामान्य कुंटूंबातील तरूण बेरोजगार होत असून त्यांच्या हाताला काम नाही. व्यवासाय करण्यासाठी पाठबळ नाही. त्यामुळे तरूणांना केवळ कौशल्य विकासाचे गाजर दाखवून आत्मर्निभर कसे होणार? हा प्रश्‍न आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT