Hapus Mango
Hapus Mango Sakal
कोकण

वातावरण बदलाचा हापूसवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या कालावधीत अवकाळी पावसामुळे मोहोरासह बारीक कैरीचे नुकसान झाले.

रत्नागिरी - अवकाळी पावसानंतर (Rain) मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रखर उन्हाचा (Heat) तडाखा आणि पाठोपाठ ढगाळ वातावरण (Environment) अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत हापूसचा (Hapus Mango) प्रवास संथगतीने सुरू आहे. आवक कमी असल्यामुळे दर चढे आहेत. सर्वसामान्यांना हापूसची चव चाखण्यासाठी मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल अखेरीस उत्पादनात वाढ होईल. त्यात गेले चार दिवस ढगाळ वातावरणामुळे तुडतुडा वाढला असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बागायतदारांना फवारणी करावी लागत आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या कालावधीत अवकाळी पावसामुळे मोहोरासह बारीक कैरीचे नुकसान झाले. त्याला सामोरे जाण्यासाठी औषध फवारणीचा हात मारावा लागला. या परिस्थितीवर मात करत असतानाच जानेवारी महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे मोहोर न आलेली ९९ टक्के झाडांना फुलोरा आला. त्यात बराचसा नर मोहोर असल्यामुळे उत्पादन मिळालेले नाही. पहिल्या टप्प्यात शिल्लक राहिलेल्या मोहोरातून फेब्रुवारीच्या अखेरीस उत्पादन हाती लागले आहे. मार्च महिन्यात सुरुवातीला वाशी बाजारात पाच हजार पेटी रत्नागिरी, देवगडमधून जात होती. त्यातील ३० टक्के पेटी रत्नागिरीतील. सध्या दोन्ही जिल्ह्यात मिळून तीस हजार पेटी (पाच डझन) पेटी जात आहे. त्यात चाळीस टक्के पेट्या रत्नागिरीतील आहेत.

यंदा प्रथमच अशी स्थिती

दरम्यान, गेले चार दिवस सलग वाढलेल्या तापमानामुळे आंबा भाजला आहे. कणीएवढी कैरी गळून गेली आहे. तसेच दोन दिवस सलग ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढला असून त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले आहे. फवारणीचा खर्चही वाढलेला आहे. मोहोर उशिरा आल्यामुळे कणीएवढी कैरी अनेक ठिकाणी आहे. बदलत्या वातावरणामुळे यंदा अशी प्रथमच स्थिती निर्माण झालेली असून त्यावर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.

आखाती प्रदेशात मागणी

आखाती देशांकडून हापूसची मागणी वाढल्यामुळे वाशीतून हवाईमार्गे वाहतूक होते. आखातात मागणीमुळे दर टिकून आहेत. उष्मा सुरू झाल्याने आंबा लवकर तयार होऊन बाजारातील आवक वाढणार आहे. एप्रिलमध्ये पवित्र रमजान सुरू होणार असल्याने मागणी आणखी वाढेल. त्यामुळे स्थानिक बाजारात दर स्थिर राहील.

आवक वाढली तर दर कमी..

दुसऱ्‍या टप्प्यात अपेक्षित मोहोर नसल्यामुळे एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात आवक राहील; मात्र एप्रिल अखेरीस आणि मे महिन्यात मुबलक आंबा बाजारात दाखल होईल. आवक वाढली तर दर कमी होईल आणि सर्वसामान्यांना हापूसची चव चाखता येईल. सध्या मुंबईत १००० ते १८०० रुपयांनी एक डझन आंबा विक्रीला जात आहे. तोच आंबा रत्नागिरीत २००० रुपयांनी विकला जात आहे. हा दर खाली येण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

युक्रेन-रशिया युद्धाचे असे परिणाम..

  • वाहतुकीचे दर अडीचपट वाढले

  • दुबईला ८० रुपये किलोला लागत

  • यंदा १८० ते २०० रुपये किलोमागे

  • समुद्रमार्गेही वाहतुकीच्या दरात वाढ

  • इंधन वाढीच्या अधिभाराचा भार

रत्नागिरी, देवगडमधील हापूसवर एक नजर

  • मार्चच्या प्रारंभी वाशी बाजारात पेटी गेली - ५ हजार

  • सध्या दोन्ही जिल्ह्यात मिळून पेटी जाते - ३० हजार पेटी (५ डझन)

  • मुंबईत एक डझन आंबा विक्रीचा दर - १००० ते १८०० रुपये

  • हा आंबा रत्नागिरीत विक्रीचा दर- २००० रुपये

  • फवारणीचा खर्चही वाढला; बागायतदार चिंतेत

हवामानातील बदलामुळे यंदा आंबा उत्पादन कमी आहे. मार्च महिन्यात काही प्रमाणात आंबा हाती आला आहे. मे महिन्यात त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

- सलील दामले, आंबा बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT