government take a decision working for in emergency pension holders stop in rajapur ratnagiri 
कोकण

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय ; आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांची पेन्शन बंद

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : तत्कालीन आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना शासनाकडून मिळत असलेली पेन्शन विद्यमान महाविकास आघाडी शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका तालुक्‍यातील पेन्शनधारक दहा जणांना बसणार आहे. 

१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी संपूर्ण देशभर आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्या विरोधात रणशिंग फुंकले होते. धरणे आंदोलन छेडत शासनाच्या निर्णयाला विरोध केला होता. यावेळी अनेकांना अटक होऊन तुरुंगामध्ये डांबण्यात आले होते. सुमारे सतरा महिन्याच्या कालखंडानंतर १९७७ मध्ये देशभर असलेली आणीबाणी उठविण्यात आली होती. त्यानंतर देशामध्ये सार्वत्रिक निवडणूका झाल्या होत्या.

आणीबाणीच्या काळात ज्या-ज्या लोकांनी तुरुंगवास भोगला होता. त्या सर्वांना दरमहा पेन्शन देण्याचा निर्णय तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित सरकारने घेतला होता. त्यामध्ये सुमारे पाच हजारासह दहा हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळत होती. त्याचा लाभ तालुक्‍यातील दहाजणांना मिळत होता. राज्यातील सध्याच्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने पूर्वीच्या सरकारने सुरू केलेली ही पेन्शन योजनाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका तालुक्‍यातील दहा पेन्शनधारकांना बसणार आहे. 

परिपत्रक अद्यापही नाही

पेन्शन रद्द करण्याचा शासन स्तरातवर निर्णय झाला असला करी त्याबाबतचे परिपत्रक अद्यापही प्रशासन स्तरावर आलेले नाही. त्यामुळे दरमहा दिली जाणारी पेन्शन अद्यापही बंद झालेली नाही. मात्र, भविष्यात बंद होण्याची शक्‍यता आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT