government take a decision working for in emergency pension holders stop in rajapur ratnagiri 
कोकण

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय ; आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या कार्यकर्त्यांची पेन्शन बंद

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : तत्कालीन आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना शासनाकडून मिळत असलेली पेन्शन विद्यमान महाविकास आघाडी शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका तालुक्‍यातील पेन्शनधारक दहा जणांना बसणार आहे. 

१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी संपूर्ण देशभर आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्या विरोधात रणशिंग फुंकले होते. धरणे आंदोलन छेडत शासनाच्या निर्णयाला विरोध केला होता. यावेळी अनेकांना अटक होऊन तुरुंगामध्ये डांबण्यात आले होते. सुमारे सतरा महिन्याच्या कालखंडानंतर १९७७ मध्ये देशभर असलेली आणीबाणी उठविण्यात आली होती. त्यानंतर देशामध्ये सार्वत्रिक निवडणूका झाल्या होत्या.

आणीबाणीच्या काळात ज्या-ज्या लोकांनी तुरुंगवास भोगला होता. त्या सर्वांना दरमहा पेन्शन देण्याचा निर्णय तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित सरकारने घेतला होता. त्यामध्ये सुमारे पाच हजारासह दहा हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळत होती. त्याचा लाभ तालुक्‍यातील दहाजणांना मिळत होता. राज्यातील सध्याच्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने पूर्वीच्या सरकारने सुरू केलेली ही पेन्शन योजनाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका तालुक्‍यातील दहा पेन्शनधारकांना बसणार आहे. 

परिपत्रक अद्यापही नाही

पेन्शन रद्द करण्याचा शासन स्तरातवर निर्णय झाला असला करी त्याबाबतचे परिपत्रक अद्यापही प्रशासन स्तरावर आलेले नाही. त्यामुळे दरमहा दिली जाणारी पेन्शन अद्यापही बंद झालेली नाही. मात्र, भविष्यात बंद होण्याची शक्‍यता आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT