Jaigad Kalzondi Part of the bridge collapsed and two story house collapsed in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत जयगड कळझोंडी पुलाचा भाग ढासळला, घराला गेले तडे

राजेश कळंबटे

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील ४८ तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसात काल रात्रीच्या सुमारास जयगड कळझोंडी येथील दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. तर जवळच असलेल्या दुमजली घराला तडे गेले आहेत. 
गेले तीन दिवस रत्नागिरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले असून पाणी पात्रा बाहेर आले आहे.

किनारी भागातील लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला आहे. तालुक्यातील कळझोडी गणसुरे वाडीकडे जाणारा पुलाचा एक पिलर पूर्णतः कोसळला आहे. याठिकाणी वाहणाऱ्या छोट्या नदीच्या पुरामुळे पिलर ढसाळला असल्याचा अंदाज वर्तवला आहे.या पुलावरील रस्त्यावर एक मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा प्रकार काल रात्री घडला.या पुलाच्या शेजारी असणाऱ्या एका दुमजली घराला तडे गेले असून सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत हे घर आहे.

रात्रीच्या सुमारास घराला तडे जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या घरातील कुटुंबाला तात्काळ दुसरीकडे हलवण्यात आले आहे. मुख्य मार्गाकडे जाण्यासाठी येथील लोकांना हा पूल उपयुक्त होता. आता या ग्रामस्थांना खंडाळा मार्गे सुमारे ६ किलोमीटरचा वळसा पडणार आहे. प्रशासनानं घटनास्थळाची पाहणी केली आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांनीही घटनास्थळाला भेट दिली.


दरम्यान,  मागील वर्षीच हा पूल खचला होता त्यावेळी जिल्हा परिषदेने तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र याकडे बांधकाम खात्याने गांभीर्याने न बघितल्याने आज ही परिस्थती ओढवली आहे असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT