leopard seen in pavas the forest officers can't martingale in konkan area 
कोकण

कोकणात बिबट्याने केला मोटारीचा पाठलाग ; दिवसाढवळ्या होत आहे दर्शन

सकाळ वृत्तसेवा

पावस : रत्नागिरी तालुक्‍यातील मेर्वी परिसरात पिंजरा लावून बसलेल्या वनविभागाला हूल देत बिबट्याने आपला मार्ग बदलला आहे. गेले काही दिवस लांजा-पावस मार्गावर बिबट्याचे दर्शन होत असून 18 सप्टेंबरला रात्री या बिबट्याने एका मोटारीचा पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. तसेच शनिवारी (19) सकाळी पावस बायपास रस्त्यावरही बिबट्याने दोघा-तिघांना दर्शन दिले. 

पावस, कुंभारघाटी, गणेशगुळे, कुर्धे, मेर्वी, पूर्णगड, मावळंगे आदी भागांत सातत्याने बिबट्याने हल्ला करून मनुष्यप्राण्याला जेरीस आणण्याचे काम केले आहे. त्या दृष्टीने त्याला जेरबंद करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत. सध्या पावस-पूर्णगड सागरी मार्गावरील बेहेरे टप्पा येथे तिघा दुचाकीस्वारांवर हल्ला झाल्याने वनविभागाने त्या भागात कॅमेरे व पिंजरे बसवत विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. गस्तीच्या माध्यमातून अनेक भागात जंगल भागात मार्गक्रमण करीत असतानादेखील दाटीवाटीच्या जंगली भागामुळे तेथे वावरणे माणसाला मुश्‍किल बनले आहे.

बिबट्या हा समंजस व 12 गावचा व्हराडी असल्याने आपला मार्ग वारंवार बदलत असतो, अशी एक अंधश्रद्धा आहे. सध्या बिबट्याने वनविभागाला बेहेरे टप्पा परिसरात केंद्रित करून आपला मार्ग मात्र बदलून पावस-लांजा मार्गाकडे मोर्चा वळवला आहे. चारचाकी गाडीचा पाठलाग केल्याने अनेकजण भयभीत झाले आहेत. त्या परिसरात असलेल्या भातशेतीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचे दिवसाढवळ्या दर्शन घडत आहे. वनविभागाने पावसला पिंजरा बसवला. परंतु वनविभागाचे कॅमेरे व पिंजरे शो च्या वस्तू बनल्या आहेत. 
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT