कोकण

..अन्यथा टाडा सुद्धा लावला असता; राणेंच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद

'नशीब टाडा रद्द झाला आहे, अन्यथा टाडा सुद्धा लावला असता', पोलिसांच्या कारभारावर नाराजी

-विनोद दळवी

ओरोस - शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. सुमारे पावणे दोन तास यावर सुनावणी सुरू असून नितेश राणे यांचे वकील संदीप मानशिंदे यांनी बाजू मांडताना 'नशीब टाडा रद्द झाला आहे, अन्यथा टाडा सुद्धा लावला असता' अशा प्रकारची नाराजी पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली.

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटक होऊ नये, यासाठी भाजपाते नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळताना जामीन जिल्हा व सत्र न्यायालयातून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २८ जानेवारी रोजी आ राणे जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज दाखल करून घेताना न्यायालयाने सोमवारी यावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले होते.

त्यानुसार आज सकाळी ही सुनावणी सुरू झाली आहे. नितेश राणे स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत माजी खासदार निलेश राणे हेही उपस्थित आहेत. तसेच विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी हे सुद्धा उपस्थित असून आमदार राणे यांच्यावतीने प्रख्यात वकील संदीप मानशिंदे, संग्राम देसाई व अन्य वकील उपस्थित आहेत. यावेळी जामीन मिळण्यासाठी बाजू मांडताना संदीप मानशिंदे यांनी "पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले आहे, ते पाहता टाडा कायदा असता तर तो सुद्धा लावला असता", असे दिसत असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT