Konkan Ganeshotsav Electric shock esakal
कोकण

चतुर्थीच्या तोंडावर परब कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर; गणपतीची आरास करताना करंट लागून बस कंडक्टरचा दुर्दैवी मृत्यू

कोकणात सध्या गणेश चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

रमाकांत परब हे टेबलवर उभे राहून घरात गणपतीची आरास करत होते.

बांदा : गणपतीची (Ganeshotsav 2023) आरास करताना विजेचा धक्का (Electric Shock) लागून सरमळे-देऊळवाडी येथील एकाचा मृत्यू झाला. रमाकांत शिवराम परब (वय ५०) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल (रविवार) सकाळी ९ वाजता घडली.

गणेश चतुर्थीच्या तोंडावरच त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परब कुटुंबीयांवर (Parab Family) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की कोकणात सध्या गणेश चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू आहे. रमाकांत परब हे काल सकाळी घरात गणपतीची आरास करत होते. टेबलवर उभे राहून ते वायरिंग करत होते.

त्यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागला. त्यामुळे ते तोल जाऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Banda Primary Health Centre) दाखल करण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी त्यांना मृत घोषित केले. रमाकांत परब हे खासगी आराम बसमध्ये वाहक होते.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बांदा आरोग्य केंद्रात धाव घेतली. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बांदा आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून तो सायंकाळी उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT