shiv bhojan thali working in lockdown period various people advantage during lockdown in ratnagiri 
कोकण

कोकणात साडे तीन लाख थाळयांनी भागवली गरजूंची भूक

राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्याने संपूर्ण देशामध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. हे संकट  'ना भूतो ना भविष्यती' असे आहे. या लॉकडाऊनचा परिणाम थेट लोकांच्या रोजगार आणि व्यवसायांवर झाला. हातावर पोट असणार्‍यांची स्थिती अधिकच बिकट आणि दयनीय झाली. मात्र अशा सर्वांच्या मदतीला धावून आली ती ‘शिवभोजन योजने’ची थाळी. 

1 एप्रिल पासून आतापर्यंत जिल्ह्यातील 20 केंद्रावर 3 लाख 50 हजार थाळयांनी अनेक गरजूंची भूक भागवली. राज्यात सत्तेवर येताना 10 रुपयांमध्ये गरिबांना जेवण पुरवणारी नावीन्यपूर्ण अशी शिवभोजन थाळी ही योजना सुरू झाली. ज्यांना उपजीविकेचे कोणतेही साधन उपलब्ध नाही, अशा सगळ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. अत्यंत माफक दरात देणारी गरिबांची एक वेळच्या जेवणाची व्यवस्था करणारी ही शिवभोजन थाळी योजना आरंभापासून  सर्वांना आधार देणारी ठरली.  टाळेबंदीत हाताला काम नाही, अशा स्थितीत यात अधिक सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि 10 रुपयांना असणारी ही थाळी 5 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली.

योजना सुरु झाली त्यावेळी जिल्हयात 3 ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु झाली. मात्र लॉकडाऊन दरम्यान इतर प्रांतात स्थलांतरित होणारे मजूर आणि ज्यांचे व्यवसाय पूर्ण ठप्प झाले अशांची संख्या वाढली. त्यामुळे जास्त ठिकाणी ही सुविधा असावी, अशी मागणी येताच शासनाने याचा विस्तार तालुक्यांच्या ठिकाणीही करण्याचा निर्णय घेतला. जिल्हयातील 9 तालुक्यांच्या ठिकाणी 20 शिवभोजन थाळी केंद्र सुरु केली.  22 मार्च नंतर सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाल्याने गतिमान पद्धतीने निर्णय घेऊन संबधित सर्व ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध झाल्याने कठीण काळात गरिबांना या योजनेने मोठा आधार दिला. 

1 एप्रिल पासून आतापर्यंत या 20 केंद्रावर 5 रुपयात शिवभोजन थाळी मिळत आहे. अशा साधारण 3 हजार थाळयांच्या माध्यमातून हातावर पोट असणार्‍या सर्वांना भोजन मिळत आहे. जिल्हयात या अंतर्गत आतापर्यंत 3 लाख 50 हजार थाळयांचे वाटप झाले आहे. वाटीभर वरण, एक भाजी, भात आणि चपाती या शिवभोजन थाळीच्या माध्यमातून  दिली जाते. कोरोना विषाणूच्या उद्रेक काळात उपलब्ध आणि सकस अन्न या निमित्ताने जिल्हयातील गरजू आणि गरीब जनतेला देण्याचे काम शिवभोजन थाळी योजनेच्या रूपाने सुरु आहे.  या योजनेने अनेकांची भूक भागवली आहे. त्यामुळे कठीण काळात गरजू लोकांचा आधार म्हणून प्रसिद्ध झाली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT