side effects of cyclone on education building in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीत 'या' घटनेमुळे ग्रामस्थांवर आली डोक्याला हात लावण्याची वेळ

सचिन माळी

मंडणगड ( रत्नागिरी ) : निसर्गचक्री वादळाच्या तडाख्याने मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमातींचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषदेने निधीच्या उपलब्धतेनुसार तालुक्यात नुकसान झालेल्या प्राथमिक शाळांचे दुरुस्ती करण्याकरिता अग्रक्रम देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. सप्टेंबर महिन्यापासून शाळांचे कामकाज सुरु करण्याचे संकेत मिळत असताना वादळात नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्तीकरिता अजुनही जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही.

निसर्गचक्री वादळामुळे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 134 शाळांचे 1 कोटी 83 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. याचबरोबर तालुक्यातील माध्यमिक खाजगी मालकीच्या 24 शाळांच्या इमारतीचे 1 कोटी 45 लाखांच्या नुकसनीचे पंचनामे करण्यात आले आहेत. शाळांच्या एकूण नुकसानीचा आकडा 3 कोटी 28 लाख रुपये इतका आहे. शाळांची छप्परे, इमारतींच्या भिंती, शैक्षणीक साहीत्याचे तसेच वर्ग खोल्यांमध्ये पाणी गेल्याने संगणक, दुरचित्रवाणी संच, डिश यांचेही नुकसान झाले. 

जुन महिन्यात शैक्षणिक सत्र सुरु होईल म्हणून जमेल त्या पध्दतीने छ्प्परांची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे आदेश शिक्षण विभागाने संबंधित शाळांतील शिक्षकांना दिले होते. त्यामुळे शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शक्य होईल तितक्या  छप्परांची शाकारणी केली आहे. इमारतीच्या कौलावर शिक्षक व ग्रामस्थांनी आपल्या खर्चाने प्लास्टीक व ताडपत्री टाकून पाणी गळती थांबवण्यावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

वादळाने नुकसान झालेले शाळांच्या भिंती व छप्परांचे पक्के काम करुन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी निधीचे आवश्यकता आहे. कामांच्या आवश्यकतेनुसार संबधित शाळांतील शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून दुरुस्तीचे प्रस्तावही जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. या संदर्भातील अग्रक्रमांच्या कामांची यादीही जिल्हा परिषदेने तयार केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रलंबीत कामांना तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा परिषद कमी पडत असल्याने सार्वजनीक संपत्ती असलेली जिल्हापरिषदेची मालमत्ता आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत ताटकळत पडली आहे.

नुकसानग्रस्त झालेल्या शाळांच्या दुरुस्तीकरिता रत्नागिरी जिल्हा परिषदेने 31 जुने 2020 पर्यंत निधी उपलब्ध करुन देत शाळा दुरुस्ती करण्यात येतील असे घोषीत केले होते. मात्र निधीअभावी ऑगस्ट महिन्याचे दुसऱ्या आठवड्यातही तालुक्यातील सर्वच शाळांची दुरुस्ती रखडली आहे. परिणामी पदरचे पैसे खर्च केलेल्या शिक्षक व ग्रामस्थांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनच्या आगामी बैठकीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहीले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT