साडवली( रत्नागिरी) : कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. काही पर्यटन केंद्रे विकसित करण्यावर भर दिला जात आहे. निधीही मंजुर करण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी येत्या वर्षभरात विमानसेवा सुरु होणार असल्याचे सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.देवरुख येथे लोकनिर्माण हिरकणी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
राऊत म्हणाले , रत्नागिरी विमानतळासाठी वाढीव जागा हवी होती ती आता मिळाली आहे.यामुळे आता या कामाला गती येणार आहे.वर्षभरात ही विमानसेवा सुरु होईल असे ते म्हणाले.
माचाळ हे ठिकाण महाबळेश्वरसारखेच आहे .माचाळ पर्यटनासाठी याआधी ९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अजुनही यासाठी किमान २० कोटी रुपये लागणार आहेत यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे.
पर्यटनासाठी मोठी हाॅटेल्स उभारली जाणार आहेत यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.कोकणात पर्यटनवाढीला चांगली संधी आहे तसे स्ञोत निर्माण करण्याचे काम सुरु झाले आहे असे राऊत यांनी सांगितले.यावेळी विलास चाळके,राजेंद्र महाडीक,रोहन बने,जया माने,बाळकृष्ण कासार,युयुत्सु आर्ते,प्रकाश कारखानिस,संजय सुर्वे आदी उपस्थित होते.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.