support to a konkan farmers damage in crop plants helps to farmers in ratnagiri 
कोकण

शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी एकत्र येऊ ; भास्कर जाधवांनी केले आवाहन

मुझफ्फर खान

चिपळूण : कोकणातील बळीराजा कठीण व अस्मानी संकटात पुरता उध्वस्त झाला आहे. त्याच्या पाठीशी आपण सर्वच लोकप्रतिनिधींनी उभे राहिले पाहिजे. ही वेळ सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आहे. कोकणातील शेतकर्‍यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी सर्वांजण एकत्र येऊ असे आवाहन गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील सर्वपक्षीय आमदारांना केले आहे. 

ते म्हणाले, नुकतेच मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे कापलेल्या पिकांचे नुकसान झाले. शेतामध्ये कापून ठेवलेली पिकं डोळ्यादेखत वाहून गेली आहेत. याची तातडीने दखल घेवून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित शासकीय अधिकार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे गुहागर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यांमध्ये महसूल विभाग व कृषी विभाग यांनी संयुक्तपणे पंचनामे करण्यास सुरूवात केले आहे. 

आपल्याकडे ज्यावेळी शेती गर्भामध्ये येते त्याचवेळी सतत पाऊस पडत होता. त्यामुळे भात किंवा नाचणी यांच्या लोंबीवर किंवा कणसांवर दाणे दिसत असले तरी ते भरीव राहत नाहीत. याचाही विचार पंचनामे करतेवेळी संबंधित अधिकार्‍यांना करण्यास मी सांगितले आहे. कोकणातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागांत फिरून शेतकर्‍यांमध्ये प्रबोधन करावे आणि अधिकचे पंचनामे करून घ्यावेत, जेणेकरून या संकटात उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना ठाकरे सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून घेण्याकरता अधिक सोयीचे होईल. याविषयी मी सातत्याने अधिकारी व कर्मचारी यांच्याशी बोलत आहेच, परंतु काही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT