कोकण

शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू

CD

शिक्षक बदलीची प्रक्रिया सुरू
सहा टप्पेः आतापर्यंत ३४६ जणांची बदली
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ः जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. बदली प्रक्रियेसाठी एकूण सहा टप्पे शासनाने निश्चित करून दिले आहेत. यातील पहिले तीन टप्पे पूर्ण झाले असून आतापर्यंत एकूण ३४६ शिक्षकांची बदली झाली आहे. चौथा टप्पा सुरू झाला असून २३ फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. २७ ला याबाबत बदली आदेश काढले जाणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
पूर्वी दरवर्षी वादग्रस्त ठरणारी शिक्षक बदली प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षांत विनावाद होत आहे. कारण शासनाने यासाठी ऑनलाईन पद्धत अवलंबली आहे. बदली पात्र शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया मानवी हस्तक्षेप न होता पूर्ण होत आहे. याकरिता शासनाने एकूण सहा टप्पे केले आहेत. विशेष संवर्ग, पती-पत्नी एकत्रीकरण, अवघड क्षेत्रातील बदली, बदली पात्र शिक्षक, विस्थापित शिक्षक, जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे अशाप्रकारे सहा टप्पे राबविण्यात येत आहेत.
यातील विशेष संवर्ग हा पहिला टप्पा असून दिव्यांग, परितक्त्या, विधवा अशा एकूण १९ प्रकारच्या विशेष संवर्गातील कार्यरत शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यासाठी जिल्ह्यातील १५३ शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यातील १४४ शिक्षक बदलीस पात्र ठरले असून त्यांची बदली झाली आहे. दुसरा टप्पा हा पती-पत्नी एकत्रीकरण यासाठी होता. याकरिता ६८ शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यातील ६७ शिक्षकांची बदली झाली आहे. तिसरा टप्पा अवघड क्षेत्रातील शिक्षक बदली यासाठी राबविण्यात आला. अवघड क्षेत्रात तीन वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांना यासाठी अर्ज करायचे होते. त्यासाठी एकूण १४५ अर्ज आले होते. त्यातील १३५ शिक्षकांची बदली झाली आहे. १० शिक्षकांची बदली झालेली नाही.
चौथा टप्पा सुरू झाला असून तो ६ ला संपणार आहे. जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षक यासाठी अर्ज करू शकतात. एका शाळेत पाच वर्षे व त्या कार्यक्षेत्रात १० वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी हा टप्पा आहे. त्यासाठी ७५९ शिक्षक पात्र आहेत. पाचवा टप्पा हा विस्थापित शिक्षकांसाठी राबविला जाणार आहे. चौथ्या टप्प्यात बदलीस पात्र असूनही ऑनलाईन अर्ज करून बदली न मागितलेल्या शिक्षकांना थेट विस्थापित करण्यात येते. या विस्थापित होणाऱ्या शिक्षकांसाठी हा टप्पा राबविण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यात विस्थापित झालेल्या शिक्षकांना पाचव्या टप्प्यात बदली करून नवीन शाळा देण्यात येणार आहे. यासाठी ७ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत प्रक्रिया राबविली जाणार आहे. शेवटचा आणि सहावा टप्पा हा जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात रिक्त असलेल्या शिक्षक पदांवर बदलीने नियुक्ती देणे यासाठी राबविला जाणार आहे. यासाठी ११ ते २२ फेब्रुवारी हा कालावधी ठेवला आहे.

चौकट
अंमलबजावणी जूनमध्ये ?
शासनाने शिक्षक बदली प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण केली असली तरी तत्काळ बदली ठिकाणी शिक्षकांना सोडण्याची कार्यवाही होण्याची शक्यता कमी आहे. कारण शैक्षणिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक राहिले आहेत. तशी कार्यवाही झाल्यास कारभारात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर ही कार्यवाही होऊ शकते; मात्र याबाबत शासनाने अद्याप कोणतेही स्पष्ट आदेश दिलेले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT