under the new policy of central government for fisherman is matt sampada and budget is 609 crore in ratnagiri 
कोकण

आता मच्छी विक्री होणार टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरने सुद्धा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. 20 हजार कोटींची ही योजना आहे. या योजनेसाठी जिल्ह्याचा 609 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. त्यामुळे मच्छीमारांसह त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना अधिक चांगला लाभ होईल. मच्छीमारांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. 

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, "पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 2022 पर्यंत मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय हा पूरक व अग्रक्रमित व्यवसाय करण्यासाठी ही योजना आणली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील मच्छीमारांनी घ्यावा. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनाने राज्यस्तरीय मंजुरी आणि संनियंत्रण समिती, जिल्हास्तरीय समिती स्थापन केली. 

समुद्री शेवाळ, तिलापिया, जिताडा, कोळंबीसारख्या अनुवांशिक सुधार कार्यक्रमांना पाठिंबा देणार आहे. मत्स्य व्यवसाय व पाणलोट प्रकल्पांसह मत्स्यपालनाशी संबंधित नवी कल्पना व नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन, मत्स्यसंवर्धक, मत्स्यपालन, कारागीर, कामगार, विक्रेत्यांना प्रशिक्षण देणार आहे.

प्रशिक्षणाद्वारे जीवरक्षक किनारी पर्यटनास आवश्‍यक गाईडस्‌ तयार केले जातील. येत्या आठवड्यात हे ट्रेनिंग सेंटर सुरू होईल. मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना, मत्स्यबीज संगोपन, तळी खोदकाम, गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी अनुदानित योजना आहेत. शोभिवंत माशांच्या संगोपनासाठीही अनुदान दिले जाणार आहे. तसेच टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरद्वाराही मच्छी विक्री करण्याची संधी या योजनेअंतर्गत उपलब्ध होणार आहे. विविध 51 योजनांचा यामध्ये समावेश आहे. 

नाणार भूकंपप्रवण क्षेत्र; प्रकल्प होणार नाही
 
राजापुरातील प्रस्तावित नाणार प्रकल्पाचा विषय संपला आहे. या ठिकाणी असणाऱ्या दलालीकडे लक्ष देणार नाही. विशेष म्हणजे राजापूर तालुका हा भूकंपप्रवण क्षेत्रात आणि रेड झोनमध्ये येतो. त्यामुळे हा प्रकल्प होणार नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाबाबत कोणीही राजकारण करू नये. लोकांच्या हिताचाच निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला आहे, असे ते म्हणाले. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT