गुवाहाटी : 2019 मधील विजयी घोडदौड 2020 या वर्षीही कायम राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला होता. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर वरुणराजाने हजेरी लावल्याने सगळ्यांचा आनंदावर पाणी पडले.
थोडी उघडीप घेतल्यानंतर खेळ सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असताना पुन्हा पावसाची सर आली. आणि सामना सुरू व्हायला आणखी विलंब लागणार अशी चिन्हे दिसू लागली. काही वेळानंतर पाऊस थांबला. आणि पावणेदहा वाजता कॅप्टन कोहलीने पंचांसोबत मैदानात उतरत खेळपट्टीची पाहणी केली. मात्र, खेळपट्टीचा काही भाग ओलसर झाल्याने कोहली नाराज झाल्याचे दिसून आले.
ओलरस भाग सुकवण्याचे प्रयत्न क्युरेटरच्या टीमने केले. पण ते पुरेसे ठरले नाहीत. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याची घोषणा पंचांनी केली.
गेल्या तीन महिन्यांपासून दुखापतीमुळे बाहेर असलेला भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा आणि डावखुरा फलंदाज शिखर धवन हे या सामन्यातून पुनरागमन करणार होते. मात्र, सामना रद्द झाल्यामुळे त्यांचे चाहते कमालीचे नाराज झाले.
तासभर सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावामुळे सामना रद्द करण्याची वेळ पंचांवर आली. कोहलीनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याशी चर्चा केली. मात्र, सामना रद्द करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय पंचांकडे नव्हता. या मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी (ता.7) इंदूर येथे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.