Why Virat Kohli Announced His Retirement From T20I sakal
क्रिकेट वर्ल्ड कप

Virat Kohli T20i Retirement : वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच विराट कोहलीने का घेतली निवृत्ती? जाणून घ्या 'त्या' मागील मोठे कारणे

Virat Kohli T20i Retirement : या विजयानंतर विराट कोहलीने मोठी घोषणा करत आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली.

Kiran Mahanavar

Why Virat Kohli Announced His Retirement From T20I : टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने लाखो स्वप्ने पूर्ण केली आहेत. शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने 7 धावांनी अविश्वसनीय विजयाची नोंद केली.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने या सामन्यात दमदार खेळी केली. या विजयानंतर विराट कोहलीने मोठी घोषणा करत आंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. अंतिम सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला की, भारतासाठी हा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता.

विराट कोहलीने भारतासाठी शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 76 धावांची शानदार खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. टीम इंडिया चॅम्पियन बनल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, आता युवा खेळाडूच्या हातात धुरा हा माझा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप होता. आता पुढच्या पिढीची वेळ आली आहे.

विराट कोहलीचे चाहते त्याच्या निवृत्तीमुळे खूप नाराज झाले आहेत पण विराट कोहलीच्या निवृत्तीची 3 प्रमुख कारणे कोणती होती ते आम्ही तुम्हाला सांगतो..

युवा खेळाडूंना संधी

निवृत्तीची घोषणा करताना विराट कोहली म्हणाला की, आता युवा पिढीने संघाची धुरा सांभाळण्याची वेळ आली आहे. हे देखील अगदी खरे आहे कारण आता पुढचा टी-20 वर्ल्ड कप 2 वर्षांनी होणार आहे आणि तोपर्यंत विराट कोहलीचा फॉर्म आणखी कमी होऊ शकतो आणि त्यावेळी त्याचे वय देखील 37 वर्षे असेल. टी-20 हा तरुणांचा खेळ आहे आणि कदाचित याच कारणांमुळे विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केली.

टी-20 मध्येआक्रमक फलंदाजी करण्यात पडला कमी

या संपूर्ण टी-20 वर्ल्ड कपवर नजर टाकल्यास विराट कोहली आवश्यकतेनुसार फलंदाजी करू शकला नाही. विराट कोहली हा खूप मोठा फलंदाज आहे आणि त्याच्या क्षमतेबद्दल शंका नाही, पण असे असूनही टी-20 मध्ये खूप वेगवान फलंदाजी आवश्यक आहे. पहिल्या चेंडूपासूनच मोठे फटके मारावे लागतात. या संपूर्ण वर्ल्ड कपदरम्यान विराट कोहलीला वाटले असेल की कदाचित टी-20 मधील डाव संपवण्याची वेळ आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी

भारतीय संघाला पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यानंतर वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिप खेळायची आहे. विराट कोहलीने आधीच या दोन स्पर्धांवर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत दिले होते. या कारणास्तव, त्याने या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! रजत पाटिदारने जिंकला टॉस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT