Duleep Trophy 2023 Semi Final Controversy  
क्रीडा

भारतात क्रिकेटची पातळी खालावली; सामना जिंकण्यासाठी केले लाजिरवाणे कृत्य; BCCI करणार कारवाई?

Kiran Mahanavar

Duleep Trophy 2023 Semi Final : क्रिकेटला एकेकाळी जेंटल मॅन्स गेम म्हटले जायचे. अलीकडेच अॅशेस मालिकेदरम्यान जॉनी बेअरस्टोच्या स्टंपिंगवरून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात जोरदार वाद झाला होता. आता भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये जिंकण्यासाठी एका संघाने सगळ्या सीमा ओलांडल्या.

पाऊस आणि अंधाराचा फायदा घेत त्याच्या गोलंदाजांनी 53 मिनिटांत केवळ 5.5 षटके टाकली. आता यावर बीसीसीआय काही कारवाई करते की नाही हे पाहावे लागेल. प्रकरण दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील उत्तर विभाग आणि दक्षिण विभागाच्या सामन्यातील आहे. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरही उत्तर विभागावर प्रचंड संताप व्यक्त केला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, उत्तर विभागाने पहिल्या डावात 198 धावा केल्या तर दक्षिण विभागाने 195 धावा केल्या. उत्तर विभागाचा संघ दुसऱ्या डावात 211 धावाच करू शकला. अशाप्रकारे रविवारी अखेरच्या दिवशी दक्षिण विभागाला विजयासाठी 215 धावांचे लक्ष्य मिळाले. पावसामुळे सामन्यावर परिणाम झाला.

सुर्य प्रकाशामुळेही सामन्यात अडथळा येऊ शकतो. अशा स्थितीत उत्तर विभागाचा कर्णधार जयंत यादव आणि त्याच्या गोलंदाजांनी वेळ वाया घालवायला सुरुवात केली. पहिल्या डावाच्या आधारे उत्तर विभागाला 31 धावांची आघाडी मिळाल्याने हे केले जात होते. अशा स्थितीत सामना अनिर्णित राहिला असता, तर नियमानुसार पहिल्या डावात आघाडी घेणारा संघ जिंकला असता.

पावसामुळे 100 मिनिटे नुकसान

पावसामुळे सुमारे 100 मिनिटांचा खेळ खराब झाला. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा दक्षिण विभागाला विजयासाठी 32 धावा करायच्या होत्या. यादरम्यान उत्तर विभागाच्या गोलंदाजांना 5.5 षटके टाकण्यासाठी 53 मिनिटे लागली. साई किशोर 11 चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला. त्याने जयंत यादववर षटकार ठोकत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. संघाने 36.1 षटकांत 8 विकेट्स राखून लक्ष्य गाठले.

सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल हा सामनावीर ठरला. दुसऱ्या डावात त्याने 57 चेंडूत 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मयंकने पहिल्या डावातही महत्त्वपूर्ण 76 धावा केल्या. आता अंतिम फेरीत दक्षिण विभागाचा संघ 12 जुलैपासून पश्चिम विभागाशी भिडणार आहे. पश्चिम विभागाने दुसऱ्या उपांत्य फेरीत मध्य विभागाचा पराभव केला. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने शतक झळकावले. पुजाराला येथे स्वत:ला सिद्ध करायचे आहे. खराब कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT