क्रीडा

मुंबईकर रोहित भारताचा कर्णधार?, विराट राजीनाम्याच्या तयारीत

नामदेव कुंभार

T20 World Cup 2021: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी-20 विश्वचषकानंतर मर्यादीत सामन्याचं (टी20 आणि एकदिवसीय) कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. विराट कोहलीच्या जागी मुंबईकर रोहित शर्माकडे टी-20 आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकते. फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विराट कोहली हा मोठा निर्णय घेऊ शकतो. विराट कोहलीने या मुद्द्यावर रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटसोबत दीर्घ चर्चा केली आहे. विराट कोहली स्वत: टी-20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा करु शकतो. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

32 वर्षीय विराट कोहली भारताच्या यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. देशात आणि विदेशात विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने अनेक ऐतिहासिक विजय संपादन केले आहेत. मात्र, विराट कोहलीला अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक अशक्यप्राय विजय मिळवले आहेत. क्रिकेटच्या तिन्ही प्रकरात भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान होता. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बाप झाल्यानंतर विराट कोहलीने फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा मोठा निर्णय घेऊ शकतो. विराट कोहली याची स्वत: घोषणा करण्याची शक्यता आहे. विराटच्या मते, फलंदाजीवर आणखी लक्ष देण्यासाठी आणि जगभरातील सर्वश्रेष्ठ फलंदाज होण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. त्यासाठी पूर्णपणे फलंदाजीवर फोकस करण्याची गरज आहे.

रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपद मिळवून दिलेय. विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीला अद्याप एकदाही चषक जिंकता आलेला नाही. कर्णधार म्हणून विराटला अद्याप एकही आयसीसी चषक जिंकता आलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 95 एकदिवसीय सामन्यात 65 विजय संपादन केले आहेत. तर 45 टी-20 सामन्यात 29 विजय मिळवले आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने अनेकदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात आतापर्यंत भारतीय संघाने अव्वल कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातात 10 एकदिवसीय सामन्यात भारताने 8 विजय मिळवले आहेत. तर 19 टी-20 सामन्यापैकी 15 सामन्यात भारताचा विजय झाला आहे.

दुबई आणि ओमानमध्ये 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान टी-20 चा थरार रंगणार आहे. त्यानंतर विराट कोहली मर्यादीत सामन्याचं नेतृत्व सोडण्याची शक्यता आहे. या टी-20 विश्वचषकानंतर पुढील दोन वर्ष विश्वचषक होणार आहेत. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे. र 2023 मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. अशापरिस्थिती रोहित शर्माला तयारीसाठी वेळ हवा आहे. त्यामुळे विराट कोहली तडकाफडकी मर्यादीत षटकांच्या सामन्याचं नेतृत्व सोडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT