ind vs aus 4th test former cricketer sanjay manjrekar made big claim on india reaching wtc final  sakal
क्रीडा

IND vs AUS : दिग्गज खेळाडूचा मोठा दावा! पराभवानंतरही टीम इंडिया WTC फायनलमध्ये...

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia 4th Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. तिसरी कसोटी जिंकून डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा ऑस्ट्रेलियन संघ पहिला संघ ठरला आहे. त्याचवेळी टीम इंडियाला चौथ्या कसोटीत विजय आवश्यक आहे तरच आपले स्थान निश्चित करता येईल. याशिवाय श्रीलंकेचा संघही या शर्यतीत आहे. त्याचवेळी माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी याबाबत मोठा दावा केला आहे.

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर म्हणाले की, भारत चौथ्या कसोटीत पराभूत झाला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचेल. श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडविरुद्धचे दोन कसोटी सामने 2-0 ने जिंकू शकत नाही, असेही त्याचे मत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्याच दिवशी श्रीलंकेने 300 चा आकडाही पार केला आहे.

संजय मांजरेकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताणा सांगितले की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. मला वाटत नाही की श्रीलंका कसोटी मालिकेत न्यूझीलंडला हरवू शकेल. त्यामुळे टीम इंडिया चौथ्या कसोटीत हरली तरी अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो.

पुढे बोलताणा ते म्हणाले की “म्हणून मला विश्वास आहे की भारत फायनलमध्ये जाईल, पण तरीही तुम्हाला अधिकृतपणे तिथे पोहोचायचे आहे. त्यामुळे संघ तणावात होता. ऑस्ट्रेलिया इंदूरमध्ये शानदार पुनरागमन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT