ind vs aus odi rohit sharma angry Indian player statement-after-team-india-lost-odi-series cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS : 'लक्ष्य फार मोठे नव्हते, आम्हाला खेळता आलं नाही...' चूक मान्य करत रोहित खेळाडूंवर बरसला

Kiran Mahanavar

Ind vs Aus ODI Rohit Sharma : ऑस्ट्रेलियाने तीन वनडे मालिकेत भारताला 2-1 ने पराभूत केले. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना चेन्नईत खेळला गेला, जो पाहुण्या संघाने 21 धावांनी जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका जिंकली. 2019 नंतर ऑस्ट्रेलिया हा एकमेव देश आहे ज्याने मायदेशात द्विपक्षीय मालिकेत भारताचा पराभव केला आहे.

ऑस्ट्रेलियाने भारताला 270 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना रोहित शर्माच्या टीम इंडियाला 248 धावा करता आल्या. विराट कोहलीने 54 धावांची खेळी खेळली. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज होता. त्याच्याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून लेगस्पिनर अॅडम झाम्पाने 4 तर अॅश्टन एगरनेही २ बळी घेतले.

सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या पराभवाचे कारण सांगितले. रोहित म्हणाला, “मला वाटत नाही की ऑस्ट्रेलियाची धावसंख्या इतकी मोठी आहे. दुसऱ्या डावात विकेट नक्कीच थोडी आव्हानात्मक होती. मला वाटत नाही की आम्ही चांगली फलंदाजी केली. अशा विकेटवर भागीदारी महत्त्वाची असते. पण आजच्या सामन्यात आम्हाला तसे करण्यात अपयश आले. फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले, हा विचार करण्याची बाब आहे. कारण आम्ही अशा विकेटवर खेळून मोठे झालो आहोत.

रोहित पुढे म्हणाला, अनेकदा तुम्हाला विकेट आणि परिस्थितीनुसार स्वतःला साचेबद्ध करावे लागते आणि स्वतःला संधी द्यावी लागते. एका फलंदाजाने सामना शेवटपर्यंत नेणे महत्त्वाचे होते. आपण सर्व चांगले करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, या सामन्यात तसे होऊ शकले नाही. जानेवारीपासून आतापर्यंत आम्ही 9 वनडे खेळलो आहोत. या सामन्यांमधून आपल्याला अनेक सकारात्मक गोष्टी शिकायला मिळतात. हे आमचे सामूहिक अपयश आहे. आम्ही ५ महिन्यांनंतर अशाच परिस्थितीत खेळताना दिसणार आहोत. याचे श्रेय तुम्ही ऑस्ट्रेलियालाही द्यावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press : १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे वगळणाऱ्या सूर्यकांतला राहुल गांधींनी थेट स्टेजवरच आणले...खुलासा ऐकून सगळेच अवाक्

हायड्रोजन बॉम्ब अजून बाकी, इलेक्शन कमिशनमधूनच मिळतेय मदत; राहुल गांधी काय म्हणाले?

Windows 10 : ऑक्टोबर महिन्यांपासून बंद होणार विंडोज 10 चा फ्री सपोर्ट; लाखो वापरकर्त्यांचा डेटा धोक्यात, आता काय करावं? जाणून घ्या

Fake Massege Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाची बनावट मेसेजद्वारे फसवणूक, अब्दुललाटच्या दोघांवर गुन्हा; का आहे नेमकं प्रकरण?

Baba Adhav : ...अन्यथा राज्यव्यापी जेल भरो आंदोलन, डॉ. बाबा आढाव; माथाडी कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्याची मागणी

SCROLL FOR NEXT