ind vs ban 2nd test kuldeep yadav dropped from playing11 
क्रीडा

IND vs BAN: ही कसली रणनीती; गेल्या सामन्यातील 'हिरो'ची हकालपट्टी

Kiran Mahanavar

Team India's Playing-11 Kuldeep Yadav OUT: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मीरपूर येथे खेळल्या जात आहे. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार शाकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने या सामन्यात दोन बदल केले असून टीम इंडियाने एक बदल केला आहे.

कर्णधार केएल राहुलने मिरपूर कसोटीत टीम इंडियात मोठा बदल केला आहे. संघाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकटला स्थान दिले. टीम इंडियाच्या या निर्णयावर चाहते प्रचंड संतापले आहेत. शेवटच्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता. त्याने एकूण 8 विकेट घेतल्या. अशा परिस्थितीत त्याला प्लेइंग-11 मधून वगळणे भारतीय चाहत्यांना पसंत नाही.

कुलदीप यादवने याआधी अनेक वेळा भारतीय संघासाठी कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तरी तो सतत संघातुन बाहेर होता. अशा परिस्थितीत टीम इंडिया नियमितपणे प्लेइंग-11 मध्ये एवढ्या दमदार गोलंदाजाचा समावेश का करत नाही, असा संताप चाहत्यांना आहे.

मीरपूरच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमची विकेटही अधिक फिरकीपटू अनुकूल आहे. अशा परिस्थितीत स्पिनरऐवजी अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय चाहत्यांनाही समजू शकलेला नाही. चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT