BCCI announce Guideline If IPL 2022 Play Off Matches Wash Out  esakal
IPL

GT vs RR सामन्यात पाऊस आला तर... बीसीसीआयचा नवा बॅकअप प्लॅन काय?

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना 24 मे रोजी कोलकात्याच्या इडन गार्डवर होणार आहे. गुजारात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या सामन्यात पाऊस व्यत्यय आणण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सामन्यात पावसाचा खेळ सुरू झालाच तर काय करायचं याचा बॅकअप प्लॅन बीसीसीआयने तयार केला आहे. जर समजा सामने झाले नाही तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा विजेता ठरवला जाईल. आयपीएलच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर एकाही षटकाचा खेळ झाला नाही तर लीगच्या गुणतालिकेनुसार विजेत्याची घोषणा केली जाईल. (BCCI announce Guideline If IPL 2022 Play Off Matches Wash Out)

बीसीसीआयचे हे नियम दोन्ही क्वालिफायर आणि एक एलिमनेटर सामन्यावरही लागू होणार आहेत. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. तर फायनलसाठी 30 मे हा राखीव दिवस आहे. फायनल रात्री आठ वाजता खेळवली जाणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. तर प्ले ऑफचे पहिले दोन सामने कोलकात्यात होणार आहेत. येथे वादळी पावसाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पहिला क्वालिफायर सामना हा गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. तर एलिमनेटर सामना लखनौ सुपर जायंट आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. तर दुसरा क्वालिफाय आणि फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे.

  • आयपीएलच्या मार्गदर्शक तत्वानुसार 'जर पावसाचा व्यत्यय आला तर प्ले ऑफचा सामना कमीतकमी 5 षटकांचा तरी खेळवण्यात यावा.

  • जर पाच षटकांचा खेळ देखील अतिरिक्त वेळेत होत नसतील तर सामन्याचा विजेता सुपर ओव्हरद्वारे निश्चित केला जाईल.

  • जर सुपर ओव्हर देखील खेळवणे शक्य नसेल तर लीग स्टेजमधील गुणतालिकेनुसार जो संघ वरच्या स्थानावर असेल त्याला विजयी घोषित करण्यात येईल.

  • जर 29 मे रोजी होणाऱ्या फायनलमध्ये देखील पावसामुळे व्यत्यय आला आणि ठरलेल्या वेळेत खेळ होत नसेल तर राखीव दिवशी 30 मे ला हा सामना सामना आहे त्या स्थितीत खेळवला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT