ABD-Bowled
ABD-Bowled 
IPL

IPL 2021: RCBच्या पराभवावर विराट काय म्हणाला? वाचा सविस्तर

विराज भागवत

विराटच्या RCB ला २० षटकात १०० धावाही करता आल्या नाहीत

IPL 2021 KKR vs RCB: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) १० षटके आणि ९ गडी राखून पराभूत केले. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकात केवळ ९२ धावा केल्या. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स यांसारखे बडे खेळाडू स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कोलकाताच्या संघाने केवळ एका गड्याच्या मोबदल्यात हा सामना खिशात घातला. पराभवानंतर विराटने आपल्या फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली.

"सुरूवात चांगली मिळाल्यानंतर आमच्या खेळाडूंकडून भागीदारीच्या अपेक्षा होती. आम्ही ४२ धावांवर १ बाद या धावसंख्येवर होतो. तेथून थेट २० धावांत आमचे ५ बळी बाद झाले. कदाचित दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच आम्हाला ही धोक्याची घंटा दिसली. जेणेकरून आम्ही यावर नीट काम करू. आम्ही आमच्या खराब कामगिरीबद्दल काही ना काही काही कारणं देऊ शकतो. पण त्याने काहीच होणार नाही. कारण अशी काहीतरी कारणं दिल्याने केवळ संघ पराभूत होतो", असं विराट म्हणाला.

Virat-Kohli

कोलकाताच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर वरूण चक्रवर्तीने सामना फिरवला. भारताकडून खेळताना त्याची भूमिका खूप महत्त्वाची असेल. नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तराच्या खेळाडूंसोबत खेळता येतं ही मोठी गोष्ट आहे. आम्ही ८ पैकी ५ सामने जिंकलो आहोत. त्यामुळे एखाद्या सामन्यात हार-जीत होणं अपेक्षितच आहे. फक्त यापुढे खेळताना आम्ही अजून जास्त चांगली तयारी करू आणि सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करत राहू", असा निर्धार विराटने व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT