Nurul Hasan accuses Virat Kohli of fake fielding sakal
क्रीडा

IND vs BAN: बांगलादेशचा रडीचा डाव, खरंच कोहलीने 'फेक फिल्डिंग' केली होती का? काय आहे ICC नियम

नुरुलने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग'चा आरोप केला आहे.

Kiran Mahanavar

Nurul Hasan Accuses Virat Kohli of Fake Fielding : टी-20 विश्वचषकाच्या 35 व्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. बांगलादेशला विजयासाठी शेवटच्या षटकात 20 धावा करायच्या होत्या, मात्र अर्शदीप सिंगने केवळ 14 धावा दिल्या. बांगलादेशविरुद्धच्या या पराभवानंतर थरकाप उडाला आहे. यष्टिरक्षक फलंदाज नुरुल हसन सोहनने या पराभवानंतर अजब विधान केले आहे. नुरुलने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीवर 'फेक फिल्डिंग'चा आरोप केला आहे.

सामन्यानंतर नुरुल हसनने सांगितले की, मैदानावरील पंचांनी विराट कोहलीच्या 'फेक फिल्डिंग'कडे दुर्लक्ष केले. बांगलादेशच्या डावाच्या सातव्या षटकात घडलेल्या घटनेचा नुरुलने उल्लेख केला आहे. कोहलीने अर्शदीप सिंगचा थ्रो पकडत नॉन स्ट्रायकरच्या फेकत असल्याचे भासवले. त्याला चेंडू पकडता आला नाही. पंच मारायस इरास्मस किंवा ख्रिस ब्राउन यांनी ते पाहिले नाही. फलंदाजांनाही ते पाहता आले नाही.

हेही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

आयसीसीचा नियम काय म्हणतो?

ICC च्या 41.5 च्या कायद्यानुसार, बॉलने जाणूनबुजून फलंदाजाचे लक्ष विचलित केले, फसवले किंवा अडथळा आणला तर त्याला डेड बॉल घोषित केले जाऊ शकते. तसेच, फलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून पाच धावा मिळतील.

नुरुलने पत्रकारांना सांगितले की, नक्कीच मैदान ओले होते आणि त्याचा परिणाम सर्वांनी पाहिला. त्या थ्रो बाबत आमची चर्चा झाली होती. त्या थ्रोवर पाच धावा दंड ठोठावले असते तर सामना आमच्या बाजूने गेला असता, पण दुर्दैवाने तसे झाले नाही.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने सात षटकांत बिनबाद 66 धावा केल्या. मग पाऊस आला. त्यावेळी भारत डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे सामन्यात 17 धावांनी पिछाडीवर होता. सामना झाला नसता तर बांगलादेश संघ जिंकला असता. मात्र, पावसाने टीम इंडियाची बाजू घेतली आणि सामना पुन्हा सुरू झाला. सामना पुन्हा सुरू झाल्यावर सगळी समीकरणे बदलली. बांगलादेशला विजयासाठी 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले. अशाप्रकारे त्यांना नऊ षटकांत ८५ धावांची गरज होती, मात्र बांगलादेशचा संघ १६ षटकांत सहा गडी गमावून १४५ धावाच करू शकला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे त्यांचा पाच धावांनी पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT