pandya brothers
pandya brothers 
क्रीडा

कॉफीतील वादळानंतर आलो ठिकाणावर!! वाचा कोणी दिली कबुली...

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : 'कॉफी विथ करण' या टीव्ही कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आलेल्या बंदीमुळे एक मोठा धक्का बसला. अस्तित्वाची जाणीव झाली तसेच विचार करण्याचा दृष्टिकोनही बदलला, अशी कबुली भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी फलंदाज के. एल. राहुलने दिली आहे.

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पंड्या आणि राहुल यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलवण्यात आले. तसेच चौकशी होईपर्यंत बंदीही घालण्यात आली होती. या प्रकरणामुळे या दोघांची बदनामीही झाली होती. 2019 मधील या प्रकरणाने चांगलाच धडा शिकवला होता. त्यानंतर विचार करण्याची माझी दिशाच बदलली. अहंकार, फाजिल आत्मविश्वास सर्व काही मी बाजूला सारले आणि संघासाठी आपल्याला काय करता येईल, याचा विचार करू लागलो, असे राहुलने सांगितले.

बंदीनंतर पुनरागमन केल्यानंतर राहुलच्या खेळात कमालीचा बदल झाला. फलंदाजीत तर त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याएवढीच कमाल करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर यष्टिरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली. क्रिकेटपटूची कारकीर्द किती कमी असू शकते, याची मला बंदीमुळे जाणीव झाली. त्यामुळे मी योग्य पद्धतीने आपल्याला कशी प्रगती करता येईल, याचा विचार सुरू केला. आयुष्यात आपण पुढे जाऊन जेवढी वर्षे खेळता येईल, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचा. एक चांगला संघसहकारी म्हणून संघात स्थान मिळवायचे, अशा विचाराने मी मला बदलले, असे राहुल म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT