Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accident sakal
क्रीडा

Rishabh Pant Accident: अपघातानंतर पंत IPL अन् ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर?

Kiran Mahanavar

Rishabh Pant Accident : टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आहे, स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीचा दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्याच्या कारला अपघात झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या कपाळाला आणि पायाला दुखापत झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी 2023 मध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान नागपुरात खेळल्या जाणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधला सर्वात मोठा मॅचविनर ऋषभ पंतला या मालिकेत खेळणे खूप कठीण आहे.

याशिवाय ऋषभ पंतसाठी आयपीएल 2023 च्या हंगामही खेळणे कठीण मानले जात आहे. ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली त्यानंतर कारला आग लागली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऋषभ पंतला श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेतून वगळण्यात आले आहे कारण फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेपूर्वी त्याला एनसीएमध्ये सामील व्हायचे आहे. ऋषभ पंतसोबत एवढा मोठा अपघात होईल, असा विचारही कुणी केला नव्हता. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताच्या विजयात ऋषभ पंतचा मोठा वाटा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT