rohit sharma virat kohli sakal
क्रीडा

Team India: बदल तर होणारच! BCCIने रोहित अन् विराटचे केलं 'पॅकअप'?

रोहित-कोहली T20 टीममधून बाहेर? BCCI संघात करणार मोठा बदल!

Kiran Mahanavar

India T20 Team : सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. जिथे संघाने प्रथम 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली आणि आता 14 डिसेंबरपासून भारताला 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्याचवेळी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झालेला कर्णधार रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशहून परतल्यानंतर भारताला पुढील 3 महिन्यांत मायदेशात श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवायचे आहे. सर्वांच्या नजरा देशांतर्गत हंगामाकडे लागल्या आहेत, कारण भारतीय संघ देशांतर्गत हंगामात बदललेला पाहायला मिळणार आहे.

आता येणाऱ्या बातम्यांनुसार दोन वेगवेगळे भारतीय संघ देशांतर्गत हंगामात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित आणि विराट कोहलीसह अनेक सीनियर्सना टी-20 संघातून वगळले जाऊ शकते आणि त्यांना एकदिवसीय आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाऊ शकते.

पुढचा टी-20 विश्वचषक 2024 मध्ये खेळला जाणार आहे. हे लक्षात घेऊन बीसीसीआय एक नवीन संघ तयार करण्याचा विचार करत आहे. ज्याची सुरुवात देशांतर्गत हंगामापासून होऊ शकते. वृत्तानुसार हार्दिक पांड्या डोमेस्टिक सीझनमध्ये टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर रोहित वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली. तेव्हापासून त्याला टी-20 चा कर्णधार बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT