IND vs ENG 
क्रीडा

IND vs ENG : भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसाने वाहून गेली तर... नियम काय सांगतो भाऊ?

उपांत्य फेरीच्या सामन्यात पाऊस झाला नाही तर... कसा लागेल निकाल

Kiran Mahanavar

IND vs ENG T20 World Cup : अॅडलेडच्या मैदानावर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात मोठी लढत रंगणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघ प्रत्येकी दोन हात करताना दिसणार आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे. पावसामुळे जर खेळ खराब झाला तर... अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चा नियम काय सांगतो.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकूण सात सामन्यांवर पावसाचा परिणाम झाला आहे. आता भारत-इंग्लंड उपांत्य फेरी आणि फायनलमध्ये पावसाचा अडथळा येईल अशी भीती चाहत्यांना वाटत आहे. उरलेल्या दोन सामन्यांमध्ये पाऊस पडला तर? वास्तविक आयसीसीने उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. पहिल्या दिवशी सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी तिथून सामना सुरू होणार आहे .

दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्ण झाला नाही, तर सुपर-12 मधील अव्वल संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. याचा अर्थ भारतीय संघ सेमी फायनल मध्ये जाईल. भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत भिडतील. भारत गट-2 मध्ये आठ गुणांसह अव्वल स्थानावर होता. नियमानुसार पावसानंतर किमान पाच-पाच षटके सामन्याचा निकाल आवश्यक आहे. नॉकआऊट सामन्यांमध्ये ती 10-10 षटकांपर्यंत कमी करण्यात आली आहे. पावसामुळे सामन्याचा निर्णय झाला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकही संयुक्त विजेता झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT