team india
team india  sakal
क्रीडा

Team India : रोहितच्या कर्णधारपदाखाली 'या' खेळाडूचे करिअर संपली!

Kiran Mahanavar

Indian Cricket Team : मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून तो बाहेर पडला आहे. शमीची जागा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवने घेतली आहे. सध्या भारतीय संघात प्रत्येक जागेसाठी तीन ते चार खेळाडू दावेदार आहेत. त्यामुळे एखाद्या खराब मालिकेमुळे खेळाडूच्या कारकिर्दीवर परिणाम करू शकते. टीम इंडियाचा एक खेळाडू असाही आहे ज्याला अनेक महिन्यांपासून संघात स्थान मिळालेले नाही. टीम इंडियामध्ये या खेळाडूचे महत्त्व अचानक कमी झाले आहे.

टीम इंडियाकडे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसारखे वेगवान गोलंदाज आहेत. हे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघातून गायब झाला आहे. आता इशांत शर्माचे संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे. इशांत शर्माने नोव्हेंबर २०२१ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

इशांत शर्माने 2007 मध्ये टीम इंडियासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. यानंतर पुढच्याच महिन्यात इशांतला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने टीम इंडियासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे इशांत शर्माला टीम इंडियातून वगळण्यात आले होते.

इशांत शर्मा टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. इशांत शर्माने भारतासाठी 105 कसोटी सामने खेळले असून 311 विकेट्स घेतले आहेत. इशांतने आतापर्यंत 80 एकदिवसीय सामन्यात 115 विकेट घेतले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये इशांत शर्माला तितकेसे यश मिळाले नाही. त्याने 14 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्माने 2016 नंतर टीम इंडियासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही. आयपीएलमध्येही त्याला संधी मिळत नाहीये. यावरून आता या खेळाडूकडे निवृत्तीचाच पर्याय उरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT