Team India esakal
क्रीडा

VIDEO : मालिका जिवंत ठेवणाऱ्या टीम इंडियाचे गरबा खेळून स्वागत

चौथ्या टी२०साठी राजकोटला पोहोचले भारतीय खेळाडू.

धनश्री ओतारी

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी-२० सामना खेळण्यासाठी राजकोटमध्ये दाखल झाला आहे. भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यासह इतर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ राजकोटमध्ये पोहोचला आहे. दरम्यान, क्रिकेट जगतात राजकोटच्या दौऱ्याची विशेष चर्चा रंगली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. संघ हॉटेलमध्ये पोहचताच गुजरातचे पारंपारिक नृत्य गरबा खेळत टीम इंडियाचे स्वागत केले.

बीसीसीआयने टीम इंडिया राजकोटमध्ये पोहचल्यानंतरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू विशाखापट्टणम ते विमानात बसण्यापासून राजकोटला पोहोचणे हा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.

यसोबतच राजकोटला पोहोचल्यानंतर, खेळाडू बसने टीम हॉटेलकडे रवाना होतात जिथे त्यांचे स्वागत गरबा नृत्याने केले जाते. अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीपही हा डान्स पाहून चकित झाला. तर अर्शदीप नाचताना दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी-२० सामना १७ जून रोजी राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. विक्रम राठोड, पारस म्हाम्ब्रे आणि टी दिलीप हा वरिष्ठ सपोर्ट स्टाफ खेळाडूंसोबत १६ जून रोजी रवाना होणार आहे. तर दुसरीकडे एनसीएचे प्रशिक्षक साईराज बहुतुले, मुनीष बाली आणि सितांशु कोटक राजकोट आणि बेंगलोरमध्ये होणाऱ्या पुढच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाला मार्गदर्शन करतील.

भारताला हा टी-२० मालिका जिंकण्यासाठी पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. हिल्या दोन सामन्यात अपेक्षित प्रदर्शन न करू शकलेले भारतीय गोलंदाज तिसऱ्या सामन्यात मात्र चमकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT