Sourav-Ganguly 
क्रीडा

"BCCI प्रत्येक वेळी फालतू प्रश्नांची उत्तर देत बसणार नाही"

विराज भागवत

BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा मिडियावर संताप, वाचा नक्की काय झालं..

भारताचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपूर्वी विविध विषयांमुळे चर्चेत आहे. T20 World Cup साठी भारताचा संघ जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच विराटने आपल्या टी२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला. टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर तो या पदावरून पायउतार होणार आहे. त्यानंतर IPL चा दुसरा टप्पा सुरू होण्याआधीच त्याने स्पर्धा संपल्यानंतर RCBचे कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितलं. या साऱ्या गोष्टींचा धुरळा खाली बसत असतानाच भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने विराटची BCCIकडे तक्रार केल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. याबद्दल BCCI कडून स्पष्टीकरण देण्यात आले.

Ravichandran Ashwin

भारताचा इंग्लंड दौरा चौथ्या कसोटीनंतर गुंडाळण्यात आला. या दौऱ्यात अश्विनला चमूत स्थान होतं, पण त्याला एकाही कसोटीत खेळण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अश्विन आणि विराट यांच्यात काही वाद आहे का अशा चर्चा होत्या. त्यातच, अश्विनने विराटबद्दल BCCIचे सचिव जय शाह यांच्याकडे तक्रार केल्याचेही सांगितले जात होते. तसेच, अश्विन व्यतिरिक्त आणखी एका खेळाडूनेही विराटविरोधात तक्रार केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण विराटच्या विरोधात कोणत्याही खेळाडूने कोणत्याही प्रकारची तक्रार केलेलीच नाही, असं BCCI कडून स्पष्ट करण्यात आले.

Ashwin-Virat

"प्रसारमाध्यमांनी अशा अफवा पसरवणं बंद करायला हवं. मी एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे सांगतो की विराट कोहलीविरोधात कोणत्याही खेळाडूने BCCIला लेखी किंवा तोंडी अशा कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. BCCI प्रत्येक वेळी असल्या फालतू गोष्टींना उत्तरं देत बसणार नाही. दोन दिवसांपूर्वी माझ्या कानावर बातमी आली की BCCI आपल्या विश्वचषकाच्या संघात बदल करणार आहे. असल्या अफवा कोण पसरवतंय? याआधीही मिडियाने मला विचारलं होतं की विराटच्या कर्णधारपदाबद्दल BCCIने निर्णय घेतलाय का? मी तेव्हा 'नाही' असंच उत्तर दिलं होतं. ते उत्तर शंभर टक्के खरं आहे. विराटने त्याचा निर्णय घेतला आणि आम्हाला कळवला. आम्ही त्याला काहीही सांगितलेलं नाही. आता हेच मिडियावाले सांगतात की कोणीतरी विराटविरोधात BCCI कडे तक्रार केली. मी तुम्हा सगळ्यांना स्पष्टपणे सांगतो की असली कुठलीही तक्रार आलेली नाही", असं BCCIचे खजिनदार अरूण धुमाळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT