Virat Kohli
Virat Kohli 
क्रीडा

"विराटच्या निर्णयाचा टीम इंडियाला T20 World Cupमध्ये फायदाच"

विराज भागवत

कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांचं मत

Virat Kohli Stepped down from T20 Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी२० विश्वचषक २०२१नंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. कामाच्या ताणामुळे हा निर्णय घेतल्याचे तो ट्वीटमध्ये म्हणाला. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे, त्यामुळे या निर्णयाचा भारताला T20 World Cupमध्ये फायदाच होईल, असं मत विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

"नवा कर्णधार आपल्या नव्या कल्पना आणि योजना संघात राबवेल. त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे नवा कर्णधार कोण असेल याची नक्कीच उत्सुकता आहे. ज्याप्रमाणे धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला नेतृत्वात मदत केली, तसाच विराटही नव्या कर्णधाराला नक्की मदत करेल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विराटने विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केलंय. त्याच्या या निर्णयाचा टीम इंडियाला फायदाच होईल. कारण कोणताही कर्णधार उंचीवर असताना पद सोडण्यास उत्सुक असतो. त्यामुळे विश्वचषक जिंकून पद सोडायचं असा विचार विराट करत असेल. आणि त्यामुळे तो सर्वोत्तम कामगिरी करेल", असे शर्मा म्हणाले.

"विराटने कर्णधारपद सोडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय खूपच विचारपूर्वक घेतला आहे. त्याने या निर्णयाआधी माझ्याशीही चर्चा केली होती. तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करायचे हा विचार कोणत्याही खेळाडूला दडपणाखाली ठेवतो. त्यामुळेच त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझा त्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे", असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT