Virat Kohli 
क्रीडा

"विराटच्या निर्णयाचा टीम इंडियाला T20 World Cupमध्ये फायदाच"

विराज भागवत

कोहलीचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांचं मत

Virat Kohli Stepped down from T20 Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने टी२० विश्वचषक २०२१नंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. कामाच्या ताणामुळे हा निर्णय घेतल्याचे तो ट्वीटमध्ये म्हणाला. विराटने विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगितलं आहे, त्यामुळे या निर्णयाचा भारताला T20 World Cupमध्ये फायदाच होईल, असं मत विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

"नवा कर्णधार आपल्या नव्या कल्पना आणि योजना संघात राबवेल. त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे नवा कर्णधार कोण असेल याची नक्कीच उत्सुकता आहे. ज्याप्रमाणे धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला नेतृत्वात मदत केली, तसाच विराटही नव्या कर्णधाराला नक्की मदत करेल. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विराटने विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केलंय. त्याच्या या निर्णयाचा टीम इंडियाला फायदाच होईल. कारण कोणताही कर्णधार उंचीवर असताना पद सोडण्यास उत्सुक असतो. त्यामुळे विश्वचषक जिंकून पद सोडायचं असा विचार विराट करत असेल. आणि त्यामुळे तो सर्वोत्तम कामगिरी करेल", असे शर्मा म्हणाले.

"विराटने कर्णधारपद सोडण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय खूपच विचारपूर्वक घेतला आहे. त्याने या निर्णयाआधी माझ्याशीही चर्चा केली होती. तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करायचे हा विचार कोणत्याही खेळाडूला दडपणाखाली ठेवतो. त्यामुळेच त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझा त्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे", असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT