West Indies vs India 2nd T20I Start delay Because Of problem of crucial team luggage arriving into St Kitts from Trinidad esakal
क्रीडा

WI vs IND : संघाच्या लगेजचा झाला लोचा! दुसरा टी 20 सामना उशिरा होणार सुरू

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 2nd T20I : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी 20 सामना उशिरा सुरू होणार आहे. हा सामना सेंट किट्सच्या वॉर्नर पार्कवर खेळवला जाणार होता. मात्र वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक काढून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणारा हा सामना आता रात्री 10 वाजता सुरू होणार आहे.

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या पत्राकानुसार 'क्रिकेट वेस्ट इंडीजच्या हात नसलेल्या गोष्टीमुळे भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना उशिरा सुरू होणार आहे. संघाचे लगेज (Team Luggage) वेळेवर पोहचणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजचा दुसरा सामना हा जमैकाच्या वेळेनुसार सकाळी 11.30 मिनिटांनी म्हणजे भारतात रात्रीच्या 10 वाजता सुरू होणार आहे. चाहते, प्रायोजक, प्रसारक आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या असुविधेसाठी क्रिकेट वेस्ट इंडीज खेद व्यक्त करते.

सामना उशिरा सुरू होणार असल्याने स्टेडियम स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.00 वाजता खुलं होईल. याचबरोबर सामन्याची तिकिटे मैदानावरील तिटिक काऊंटरव उपलब्ध असतील. भारताने पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 68 धावांनी जिंकून मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Red object in galaxy : अवकाशात दिसले रहस्यमयी लाल ठिपके, पृथ्वीवर होणार गंभीर परिणाम? नेमका विषय काय, जाणून घ्या..

Anurag Thakur : सशक्त भारतासाठी मोदींची पंचसूत्री आवश्‍यक; माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Latest Marathi News Updates : प्राण गमावलेल्यांच्या कृत्यांबद्दल ऐक्य व्यक्त करण्यासाठी बौद्धनाथ स्तूपाबाहेर मेणबत्ती मार्च

SCROLL FOR NEXT