Can Yashasvi Jaiswal Bat Again On Day 4 After Being Retired Hurt marathi news sakal
क्रीडा

Ind vs Eng : रिटायर्ड हर्ट की रिटायर्ड आऊट, राजकोट कसोटीत यशस्वी जैस्वाल पुन्हा करणार फलंदाजी? जाणून घ्या ICC चा नियम

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात तीन दिवसांच्या खेळानंतर भारतीय संघाने इंग्लंडवर आपली पकड कायम ठेवली आहे.

Kiran Mahanavar

IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात तीन दिवसांच्या खेळानंतर भारतीय संघाने इंग्लंडवर आपली पकड कायम ठेवली आहे.

पण टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी मोठा फटका बसला. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ट झाला. अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वाल पुन्हा फलंदाजी करू शकेल की नाही हे पाहू.

रिटायर्ड आऊट म्हणजे काय?

आयसीसीच्या नियमानुसार, एक फलंदाज डावात कधीही रिटायर्ड आऊट होऊ शकतो. एकदा फलंदाज जाणूनबुजून रिटायर्ड आऊट झाला का, विरोधी कर्णधाराने परवानगी दिल्याशिवाय तो सामन्यात आपला डाव पुन्हा सुरू करू शकत नाही.

पण जर फलंदाज फलंदाजीला परतला नाही, तर फलंदाजाला 'रिटायर्ड आऊट' घोषित केले जाते आणि त्यामुळे रेकॉर्डमध्ये त्याला बाद मानले जाते.

आता, खेळात रिटायर्ड आऊट ही दुर्मिळ घटना आहे. अलीकडे हा नियम चर्चेत आला आहे. आणि सामन्याच्या परिस्थितीनुसार संघ त्याचा वापर करत आहेत, विशेषत: टी-20 सामन्यांमध्ये.

रिटायर्ड हर्ट म्हणजे काय ?

मैदानावर कोणताही गेम खेळताना दुखापत होते, आणि क्रिकेट यापेक्षा वेगळे नाही. नेटवर सराव करताना किंवा सामन्यादरम्यान खेळाडूंना दुखापत होऊ शकते. आता, सरावाच्या वेळी खेळाडूला दुखापत झाल्यास, दुखापतीचे मूल्यांकन केल्यानंतर तो काही दिवस विश्रांती घेऊ शकतो. पण सामन्यादरम्यान एखाद्या फलंदाजाला दुखापत झाली तर? तेव्हाच रिटायर हर्ट नियम लागू होतो. पण रिटायर हर्ट हा रिटायर्ड आऊट होण्यापेक्षा वेगळा शब्द आहे.

बघा, जर एखादा फलंदाज दुखापतीमुळे किंवा कोणत्याही अपरिहार्य परिस्थितीमुळे रिटायर्ड झाला तर, काही वेळासाठी तो रिटायर्ड हर्ट म्हणून चिन्हांकित केला जातो. पण, रिटायर्ड आऊट झालेल्या फलंदाजाप्रमाणे, रिटायर्ड हर्ट झालेला फलंदाज फलंदाजीला परत येऊ शकतो. यांचा अर्थ यशस्वी जैस्वाल खेळाच्या चौथ्या दिवशी फलंदाजीसाठी उतरू शकते.

राजकोट कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 445 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली होती, पण त्यांना केवळ 319 धावा करता आल्या आणि सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 196 धावा केल्या असून त्यांची आघाडी 322 धावांवर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

Gold Rate Today: सोन्याच्या भाव कोसळले! अमेरिकेच्या इराणवरील कारवाईचा परिणाम; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Randhir Singh: क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन; प्रदीर्घ आजाराने ७९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

SCROLL FOR NEXT