WTC Finals 2023 India Lost Austraila Beat Rohit Sharma  esakal
क्रीडा

WTC India Defeat Memes : 'या चिमण्यांनो परत फिरा रे!' छान खेळलात, भारतात निघून या, नेटकऱ्यांनी झापले

सोशल मीडियावरुन टीम इंडियावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. ते म्हणजे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून झालेला दारुण पराभव.

युगंधर ताजणे

WTC Finals 2023 India Lost Austraila Beat Rohit : सोशल मीडियावरुन टीम इंडियावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. ते म्हणजे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून झालेला दारुण पराभव. काहीही झालं तरी टीम इंडिया यंदाच्या डब्ल्यु टी सी स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करणार असे बोलले जात होते. मात्र आता कांगारुंनी भारताचे पानिपत केले आहे.

भारतीय संघाचा पराभव हा चाहत्यांच्या, किक्रेटप्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच की काय त्यांनी सोशल मीडियावर टीम इंडियाच्या खेळाडूंवर चांगलीच आगपाखड केली आहे. नेहमीप्रमाणे एक दोन खेळाडू खेळतात आणि बाकीचे हजेरी लावून जातात. अशा प्रकारचे मीम्स व्हायरल झाले आहेत. काहींनी तुम्ही फक्त आय़पीएलमध्येच चमकता बाकीच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला काही खेळता येत नाही. हे तुम्हीच दाखवून दिले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

नेटकऱ्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ते चेतेश्वर पुजारा यासगळ्यांना तिखट शब्दांत सुनावले आहे. रोहितच अपयश हे आता क्रिकेटप्रेमींना खूपताना दिसत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचा फॉर्म हे टीम इंडियासाठी चिंतेचे कारण ठरत आहे. अशावेळी त्यानं थोडी मोठी का होईना खेळी करावी असे चाहत्यांचे म्हणणे होते. मात्र शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्याचे दिसून आले. त्याची खेळी पाहून नेटकरी कमालीचे संतापले आहेत.

कोहलीकडून देखील क्रिकेटप्रेमींना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यानंही निराशा केली. भलेही टीम इंडिया जिंकणार नाही याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सामना अनिर्णित कसा राहील याचा प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र तसेही झाले नाही.

भारतीय संघाकडून कोणत्याही प्रकारे लढत दिल्याचे दिसून आले नाही. अतिशय स्वस्तात फलंदाज बाद झाले. आणि शेवटच्या फळीतील फलंदाजांकडून कोणत्याही प्रकारे अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव करत जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिरवला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर चौथ्या डावात विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला आपल्या दुसऱ्या डावात 234 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सलग दुसऱ्यांदा WTC च्या फायनलमध्ये धडक मारली खरी पण त्यांच्या वाट्याला पराभव आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT