apj abdul kalam
apj abdul kalam 
लाइफस्टाइल

अब्दुल कलाम यांचे १० विचार, जे तुमचे आयुष्य बदलवू शकतात

सकाळ डिजिटल टीम

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, एक महान शिक्षक आणि प्रख्यात शास्त्रज्ञदेखील होते. सामान्य लोकांना विशेषत: तरुणांना आपलंसं करण्याच्या त्यांच्या अद्वितीय गुणामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे राष्ट्रपती होते.

जागतिक विद्यार्थी दिवस २०२१ : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणजेच १५ ऑक्टोबर हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जगभरात साजरा केला जाते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, एक महान शिक्षक आणि प्रख्यात शास्त्रज्ञदेखील होते. सामान्य लोकांना विशेषत: तरुणांना आपलंसं करण्याच्या त्यांच्या अद्वितीय गुणामुळे ते खऱ्या अर्थाने जनतेचे राष्ट्रपती होते. भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी दुसऱ्याच दिवशी अध्यापनाचं काम सुरु केले.

तरुणांना त्यांनी मोठी स्वप्न पाहण्यास आणि अपयशाची भीती न बाळगता मेहनत करण्यास नेहमीच प्रेरित केले. डॉ. कलाम हे केवळ विद्यार्थ्यासाठीच नव्हे, तर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठीही आदर्श होते. डॉ. कलाम यांचा विश्वास होता की, ''चांगले शिक्षक महान व्यक्तिमत्त्वं घडवू शकतात.''

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी २००४ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार समारंभावेळी शिक्षकांना संबोधित करताना म्हटले होते की, “शिक्षण प्रक्रिया, शालेय वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रज्वलित करणे हे सर्व शिक्षकांच्या क्षमतेवर अवलंबून असते. ''शिक्षण सर्जनशीलता देते, सर्जनशीलता विचार करण्यास प्रेरित करते, विचार ज्ञान देते, ज्ञान आपल्याला महान बनवते. "

APJ abdul kalam

कलाम यांच्या संघर्षमय जीवनातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. त्यांचे विचार आजही तरुण पिढीला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. डॉ. कलाम यांच्या विचारांचा अवलंब केला, तर तुमचे आयुष्य बदलू शकते.

१. ''स्वप्ने ती नाहीत जी तुम्ही झोपल्यानंतर बघता, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.''

२. ''आपला आजचा त्याग येणाऱ्या पिढीचं भविष्य घडवू शकतो.''

३. ''विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला हवेत. हा विद्यार्थ्यांचा सर्वोत्तम गुण आहे.''

४. ''देशासाठी सर्वोत्तम विचार करणारे वर्गाच्या शेवटच्या बाकांवरही असू शकतात.''

५. ''जे थांबतात त्यांना फक्त तेच मिळते, जे प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिले आहे.''

६. ''आयुष्यात आनंदाचा अनुभव तेव्हाच येतो, जेव्हा तो आनंद अडचणींमधून मिळतो.''

७. ''शिखर गाठण्यासाठी ताकद लागते, मग तो माउंट एव्हरेस्ट शिखर असो किंवा इतर कोणतेही ध्येय.''

८. ''दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येते, या दुःखांमध्येच प्रत्येकाच्या संयमाची परीक्षा होते.''

९. ''स्वप्ने तेव्हाच पूर्ण होतात, जेव्हा आपण स्वप्ने पाहण्यास सुरुवात करतो.''

१०. ''अडचणींनंतर मिळालेले यश खरा आनंद देते.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT