road accident esakal
लाइफस्टाइल

वाहन चालवताना या गोष्टी पाळा! अपघात टाळा

दरवर्षी रस्ते अपघातात लाखो जीव जातात.

सकाळ डिजिटल टीम

दरवर्षी रस्ते अपघातात लाखो जीव जातात.

दरवर्षी रस्ते अपघातात (Road Accident) लाखो जीव जातात. वाहने रस्त्यावर असतील तर अपघात होणे स्वाभाविक आहे. आपल्या थोड्याशा समजुतीने, अपघाताची शक्यता खूप कमी केली जाऊ शकते. अपघात टाळण्यासाठी वाहनचालकाने काही गोष्टींची खबरदारी घ्यावी. या 5 चुका कोणत्याही वाहनचालकाकडून (Driver) होऊ नयेत, यासाठी खबरदारी घ्या.

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे - चालकाने नेहमी काळजी घेतली पाहिजे की तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तर नाहीयेय ना. मद्यधुंद अवस्थेत चालकाचे हात-पाय नियंत्रणाबाहेर जातात. यामुळे अपघात होणे स्वाभाविक आहे. म्हणून दारू पिऊन गाडी चालवू नका.

झोपेत गाडी चालवणे - "दुर्घटना से देर भली" ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. अनेक वेळा आपल्याला थकवा किंवा रात्री गाडी चालवताना झोप येऊ लागते. अशावेळी झोप आल्यास वाहन बाजूला उभे करा. तसेच दुसरा ड्रायव्हर सोबत घ्या यामुळे आळीपाळीने विश्रांती घेणेही सोयीस्कर ठरते.

ओव्हर स्पीड चालणे - अपघाताचे प्रमुख कारण म्हणजे भरधाव वेगाने (ओव्हर स्पीड गाडी चालवणे हेही आहे. या ओव्हर स्पीडमुळे गाडी ब्रेकला लावल्यावर ज्या अंतरात थांबायला हवी, त्या अंतरात गाडी थांबू शकत नाही यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.

हवामानाच्या विरुद्ध वाहन चालविणे - अपघातांचे एक मुख्य कारण म्हणजे हवामान. पाऊस आणि दाट धुक्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. धुक्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने ब्रेक लावल्यावर समोरून येणाऱ्या वाहनालाही धक्का बसतो. त्यामुळे अधिक धुके आणि पावसात गाडी चालवली नाही तर बरे होईल.

नियमाविरुद्ध वाहन चालविणे - वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालवा. लाल दिव्याचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडतात. रोड साइन, ट्रॅफिक सिग्नल, लाइट सिग्नल आणि चौक ओलांडण्याचा मार्ग इ.सर्व गोष्टी लक्षात घेऊन वाहन चालवणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाची रिपरिप, हवामान विभागाचा अंदाज

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

SCROLL FOR NEXT